ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन कृषी विभागाच्या योजनांचा सर्व शेतकर्यांना लाभ मिळवुन देवु – सभापती बालाजी मुंडे

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन कृषी विभागाच्या योजनांचा सर्व शेतकर्यांना लाभ मिळवुन देवु - सभापती बालाजी मुंडे

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन परळी तालुक्यातील सर्व शेतकर्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मिळवुन देवु असे आश्वासन पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे यांनी दिले. कृषी अधिकारी कार्यालयात आज दि.14 जून रोजी सलग पिक प्रात्यक्षिके आत्मा अंतर्गत शेतकरी गटामार्फत राबवण्यासाठी सोडत काढण्यात आली त्यावेळी मुंडे बोलत होते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा गळीत धान्य व तेलताड अभियान 21- 22 अंतर्गत सलग पिक प्रात्यक्षिके आत्मा अंतर्गत स्थापित शेतकरी गटामार्फत राबविण्यासाठी सोडत पध्दतीने पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे यांच्या हस्ते सोडत पध्दतीने निवड करण्यात आली.यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की कृषी कार्यालय व परळी पंचायत समिती मार्फत शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात कृषी विभागाच्या वतिने शासनाच्या या योजनांचा सर्वसामान्य शेतकर्यांनी फायदा घ्यावा असे सांगीतले.यावेळी कृ.उ.बा.स.संचालक माऊली गडदे,तालुका कृषी अधिकारी ए.ए.सोनवणे,मंडळ अधिकारी एस.एस.गादेकर,मंडळ कृषी अधिकारी एम.बी.कवडे,कृषी पर्यवेक्षक सी.एन.थोन्टे,व्ही.एन.जाधवर,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सौ.के.एल.फड,सहाय्यक व्यवस्थापक व्ही.पी.मिश्रा,व्ही.एम.बीडगर व शेतकरी गट प्रमुख आणी शेतकरी उपस्थित होते.
कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत गट प्रात्यक्षिकांची सोडत सलग सोयाबीन लागवडीचे प्रात्यक्षिके प्रकल्प, तुर सलग लागवड प्रकल्प, सोयाबीन व तूर प्रकल्प यांची निवड उपस्थितांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत व इन कँमेरा या निवड करण्यात आली. कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत आत्मा योजनेत नोंदणीकृत सर्व गटांच्या चिठ्ठ्या एकत्र तयार करून सभापती बालाजी मुंडे, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या उपस्थित करण्यात आले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!