दयानंद शिक्षण संस्थेचा योग पॅटर्न सर्वदूर पोचावा – शशिकांत पाटील

दयानंद शिक्षण संस्थेचा योग पॅटर्न सर्वदूर पोचावा - शशिकांत पाटील

दयानंद शिक्षण संस्थेत योग प्राणायाम ध्यान शिबिराचा समारोप

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेने सुरू केलेला योग पॅटर्न हा लातूर पॅटर्न प्रमाणे सर्वत्र पोचवा असे प्रतिपादन झी 24 तासचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी केले. ते दयानंद शिक्षण संस्था व दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने योग, प्राणायाम व ध्यान शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की,”योग प्राणायाम आणि ध्यान यामुळे कार्यक्षमता वाढते, मन प्रसन्न होते याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होते. या शिबीराचा लाभ केवळ पाच दिवसापुरता मर्यादित न ठेवता योग प्राणायाम हा जीवनाचा अविभाज्य घटक बनवावा. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम सोळुंके म्हणाले की, दि 9 ते 13 जून या कालावधीत दयानंद शिक्षण संस्थेतील पदाधिकारी , सर्व प्राचार्य , प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दयानंद शिक्षण संस्था व दि आर्ट ऑफ लिव्हिंग ने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जिल्हा समन्वयक डॉ वसुंधरा गुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या की,”श्री श्री रवीशंकर यांच्या प्रयत्नातून दिव्य समाज निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास व्हावा यासाठी हे शिबीर निश्चितच उपयुक ठरेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड हे उपस्थित होते. कु.रोहिणी लखादिवे व कु.सई शिंदे या कला शाखेतील बारावीच्या विद्यार्थिनीनी या शिबिरा विषयी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविल्या तर प्राध्यापकांच्या वतीने डॉ. अंजली जोशी, डॉ. संतोष पाटील यांनी शिबिराविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन पतंगे, प्रा. इरफान शेख, प्रा. महेश जंगापल्ले यांनी परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!