खत आणि बियाणे यांची साठेबाजी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना धडा शिकवा – किसान मोर्चा ची मागणी

खत आणि बियाणे यांची साठेबाजी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना धडा शिकवा - किसान मोर्चा ची मागणी

 उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुका आणि परिसरात बी -बियाणे आणि खते यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने बियाणी आणि खतांची विक्री केली जात असल्याची ओरड शेतकरी वर्गातून होत आहे. हे तात्काळ थांबले पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य दरात आणि त्यांना हवेत त्या प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करणारे निवेदन किसान मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

 सध्या उदगीर तालुका आणि परिसरात मृग नक्षत्राचा पाऊस चांगला झाल्याने शेतकरी पेरणीसाठी धडपडताहेत. मात्र अनेक कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असून जुन्या खताचा साठा असतानाही तो साठा न दाखवता वाढीव दराने सर्रास खत विक्री केली जात आहे. अशी तक्रार शेतकरी करत आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाणांसाठी ही शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागत आहे. बाजारात खतांची आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आहे. या बाबीकडे महसूल प्रशासन आणि कृषी खात्याने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकरी आणि विक्रेते यांच्यामध्ये वाद होऊ लागले आहेत. हे थांबले पाहिजेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशीही मागणी सदरील निवेदनात केली आहे. त्या निवेदनावर किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पंडितराव सुकणीकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना या जगाचा पोशिंद्यालाच लुबाडण्याचे पाप व्यापारी करताहेत. शेतकऱ्यांना हव्या असलेल्या खतांच्या ऐवजी इतर खतांची विक्री करण्यासाठी व्यापारी आग्रही आहेत. तसेच शेतकऱ्यांना हव्या असलेल्या कंपनीच्या सोयाबीन बियाणे ऐवजी इतर कंपन्यांची बियाणे विकण्यासाठी कृषी सेवा केंद्र प्रयत्न करत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होते आहे.

 गेल्या दोन वर्षी बोगस बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आर्थिक बोजा सहन करावा लागला. तसेच उत्पादनातही घट झाल्याने तेथे ही तोटा सहन करावा लागला. अशा दुहेरी संकटात शेतकरी भरडला गेला होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विश्वासाहर्ता असलेल्या कंपन्यांचीच बियाणे हवी आहेत. मात्र व्यापाऱ्याकडून इतर बियाण्यांसाठी आग्रह केला जात असल्याचेही शेतकरी बोलत आहेत. अडला हरी….. म्हणतात त्याप्रमाणे पेरणीच्या लगबगीत मिळेल ते बियाणे घेण्याकडे काही शेतकऱ्यांचा ओढा आहे. मात्र अशा बियाणांमुळे जर नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण होतो आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून शासन आणि प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कार्य करावे. अशी आग्रही मागणी किसान मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!