समाज माध्यमांचा गैरवापर करून दीड लाखाला फसवले

समाज माध्यमांचा गैरवापर करून दीड लाखाला फसवले

उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : सध्या समाज माध्यमाच्या गैर वापराचे पेव फुटले आहे. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून सर्वसामान्यांची लुबाडणूक करणे चालू आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींचे अकाउंट हॅक करून त्याच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. असाच काहीसा प्रकार उदगिर शहरात घडला आहे. यासंदर्भात उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हैद्राबाद येथे राहणारा फिर्यादी मकरंद पद्माकर देशमुख हे उदगीर येथे काही कामानिमित्त आले होते. त्यांच्या एका मित्राच्या व्हाट्सअप क्रमांकावरून दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा संदेश त्यांना मिळाला. फिर्यादी मकरंद देशमुख यांनी आपला मित्र अडचणीत असल्यामुळे पैशाची मागणी करत असेल असे समजून ऑनलाइन पद्धतीने दीड लाख रुपयांची रक्कम संबंधितांच्या खात्यावर पाठवली. त्यानंतर मित्राशी संवाद साधून या संदर्भात माहिती विचारली असता, आपण पैसे मागितले नसल्याचे देशमुख यांना त्यांच्या मित्राने सांगितले.

 व्हॉट्सऍप हॅक करून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच मकरंद देशमुख यांनी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. ज्या बँकेत खात्यावर पैसे पाठवण्यात आले त्या बँकेचा पत्ता काढल्यानंतर प्रीतमकुमार रेंग रा. डुलुमा (त्रिपुरा राज्य) त्याच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याची माहिती प्राप्त झाली. प्रीतमकुमार रेंग त्याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 168 /21 कलम 66 (सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक गोरख दिवे हे करत आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!