कोरोनामुळे निराधार झालेल्या कुटुंबीयांना मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ

कोरोनामुळे निराधार झालेल्या कुटुंबीयांना मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ

लातूर ग्रामीण संगांयो समिती, लातूर तहसील कार्यालय व सखी वन स्टॉप सेंटरने घेतला पुढाकार

लातूर (प्रतिनिधी) : लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर तालुक्यातील कोरोना संसर्गाने दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला शासकीय योजनांचा घरपोच लाभ देण्यासाठी लातूर ग्रामीणची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती कार्यरत असून विविध योजनांसाठी पात्र कुटुंबांना गावपातळीवर एकाच वेळी लाभ देण्यासंदर्भाने नुकतेच ‘संगांयो’चे अध्यक्ष प्रविण हणमंतराव पाटील यांनी लातूरचे तहसीलदार तथा संगांयो समितीचे सचिव स्वप्नील पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नायब तहसीलदार राजेश जाधव, बाल संरक्षण अधिकारी सिताराम कांबळे व सखी वन स्टॉप सेंटर लातूर च्या केंद्र समन्वयिका श्रीमती मंगल जाधव मगर यांची उपस्थिती होती.

पहिल्या व दुस-या कोरोनाच्या लाटेत घरातील कमावता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मानसिक, आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतील हे अभियान प्रशासनाने हाती घेतले आहे. लातूर ग्रामीणची ‘संगांयो’ समिती सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख व आमदार धिरजजी विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना घरपोच विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सरसावली आहे. लातूर तालुक्यातील बोरी येथे निराधार कुटुंबांना संगांयोच्या वतीने भेटी देऊन त्यांच्याकडून निराधार महिला, वयोवृद्ध यासह बालसंगोपन योजनांचे अर्ज नुकतेच भरुन घेण्यात आले. यावेळी ‘संगांयो’चे अध्यक्ष प्रविण पाटील, सखी वन स्टॉप सेंटर लातूर च्या केंद्र समन्वयिका श्रीमती मंगल जाधव मगर, बोरी येथील पदाधिकारी शंकरराव पाटील, कमलाकर अनंतवाड, दिलीप पेदाटे, कविता भंडे, तलाठी जंगमे आदी उपस्थित होते.

स्थानिक प्रशासन व गावातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने निराधार पात्र कुटुंबांचा शोध घेऊन त्यांचा अर्ज भरुन संबंधित कुटुंबाकडून आवश्यक ती कागदपत्रे जमा केली जात आहेत. यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार, ‘संगांयो’ चे सदस्य तथा लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्याम गोडभरले, नायब तहसीलदार राजेश जाधव, श्रावण ऊगिले, रत्नाकर महामुनी, ‘संगांयो’ समितीचे सदस्य सर्वश्री अमोल देडे, सौ.शितल राजकुमार सुरवसे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, परमेश्वर पवार, रमेश पाटील व आकाश कणसे आदींच्या सामुहिक प्रयत्नांतून संबंधित विभागाकडून तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

कोरोनामुळे कुटुंबाचे छत्र हरवलेल्या लातूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे तेव्हा प्रत्येक गावातील निराधार कुटुंबांनी संगांयो समितीचे सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी प्रशासकीय अधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच स्थानिक लोकप्रतिनिधी व संजय गांधी योजना समन्वयक यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन लातूर ग्रामीण ‘संगांयो’ समितीचे अध्यक्ष प्रविण पाटील, लातूर संगांयो समितीचे सचिव तथा तहसीलदार स्वप्नील पवार यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!