आशा स्वंयसेविका यांच्या मागण्या मान्य करा – आमदार बाबासाहेब पाटील

आशा स्वंयसेविका यांच्या मागण्या मान्य करा - आमदार बाबासाहेब पाटील

आमदार बाबासाहेब पाटील यांची पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्यातील सुमारे 70 हजार आशा स्वंयसेविका व 4000 गट प्रवर्तक यांच्या मागण्या मान्य करण्याचे निवेदन आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा सेविका जोखीम पत्करून जिल्ह्यात कोरोनाच्या लढाईत स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आशा सेविकांना त्यांच्या
कामाची दखल घेऊन त्यांच्या विविध मागण्या मान्य करा.

संवादा दरम्यान आशा सेविकांनी आपल्या अडचणी मांडल्या होत्या. कामाचा प्रचंड ताण व अहोरात्र परिश्रम करत असतानाही त्या बदल्यात मानधन मात्र अतिशय तुटपुंजे मिळते, परिणामी घर खर्च भागवणे अशक्य असल्याचे सांगत मानधनात वाढ करण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच आठ महिन्याची गरोदर आशा सैनिकांना बालसंगोपन रजा देण्याची कायदेशीर तरतुद नसल्याचे व तीन महिन्यांपेक्षा जास्त सुट्टी घेता येत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याबाबत प्रशासनाकडे आपण व्यक्तिशः पाठपुरावा करत आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागात गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी खूप जिद्दीने यामध्ये काम केलेले आहे. एक ते दीड वर्षापासून आजपर्यंत त्या सातत्याने सर्वेक्षण करणे, विलगीकरणास भेटी देणे, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यास तात्काळ भेटी देणे, 14 दिवस सर्वेक्षण करून रुग्ण शोधणे, अशाप्रकारची महत्वाची कामे पार पाडली आहेत. त्यांची ही कामे अद्यापही सुरूच आहेत. या कामासाठी आशांना नियमित मानधन दिले जात नाही. कामावर आधारित मोबदला दिला जातो. त्यांना अत्यंत तुटपुंजे मानधन आरोग्य विभागाकडून मिळत होते. ही बाब विचारात घेऊन व त्यांच्या कामाची दखल घ्यावी. याच धर्तीवर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करावे अशी विनंती आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!