तोंडचिर व घोणसी साठवण तलावासाठी ३४ कोटी ६७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर ना. संजय बनसोडे यांची माहिती

0
तोंडचिर व घोणसी साठवण तलावासाठी ३४ कोटी ६७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर ना. संजय बनसोडे यांची माहिती

तोंडचिर व घोणसी साठवण तलावासाठी ३४ कोटी ६७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर ना. संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील तोंडचिर येथील १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या साठवण तलावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन या साठवण तलावासाठी १९ कोटी ३१ लक्ष ८५ हजार ८१० रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जळकोट तालुक्यातील घोणसी तांडा खंबाळवाडी येथे २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या साठवण तलावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन या साठवण तलावासाठी १५ कोटी ३६ लक्ष ३ हजार ८४४ रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच याची निविदा प्रक्रिया होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर तालुक्याती तोंडचिर व जळकोट तालुक्यातील घोणसी तांडा खंबाळवाडी येथे साठवण तलावाची निर्मिती झाल्यास या भागातील शेतकऱ्याच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होवून त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होईल. त्याच बरोबर या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल व पाणी असल्यामुळे जनावरांसाठी मुबलक चारा व पाणी मिळणार असल्याने दुधाचे उत्पन्न वाढेल. शेती सोबतच दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा करुन या भागातील शेतकरी सुखी, समृध्द होईल. अशी अपेक्षा ना.संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
मतदार संघात दोन साठवण तलाव मंजूर केल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
तोंडचिर व घोणसी येथे साठवण तलाव मंजूर केल्याने या भागातील शेतकरी, शेतमजूर गावातील प्रतिष्ठित नागरीकांनी या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!