सगे सोयरे अधिनियम बाबत मराठा समाज आक्रमक

0
सगे सोयरे अधिनियम बाबत मराठा समाज आक्रमक

सगे सोयरे अधिनियम बाबत मराठा समाज आक्रमक

24 तारखेपासून मराठा आंदोलक “आदर्श रास्तारोको”आंदोलन करणार

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा आरक्षण संदर्भात राज्य शासनाच्या वतीने फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करत येत्या दोन दिवसात सगेसोयरे बाबतीत चा अधिनियम लागू करावा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असून येत्या 24 तारखेपासून गावोगावी ‘आदर्शरास्ता रोको ” करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आंदोलन बाबत नेहमीच अग्रेसर असलेल्या अहमदपूर सकल मराठा समनव्यय समितीच्या वतीने देण्यात आली.
आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी काल अंतरवाली सराठी येथे महाराष्ट्रातून आलेल्या मराठा बांधवासोबत झालेल्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली त्या पार्श्वभूमीवर अहमदपूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काल सायंकाळी सकल मराठा समाज समनव्यय समितीची बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थित समाज बांधवांनी शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला यावेळी सर्वानुमते खालील निर्णय घेण्यात आले
यामध्ये 24 तारखेपासून बेमुदत आदर्श रास्ता रोको अहमदपूर येथील रायगड चौक येथे करण्यात येणार असून त्यानंतर टप्याटप्याने गावोगावी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी तालुक्यातील सर्व गावांना या मध्ये सहभागी करण्यात येणार आहे.
राजकीय नेत्यांनी त्यात आमदार खासदार मंत्री यांना गाव बंदी करण्यात आली असून कोणत्याही राजकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे प्रचार वाहन गावा गावामध्ये जप्त करण्यात येणार आहेत राजकीय लोकांनी सहकार्य करावे अन्यथा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर सकल मराठा समाजातर्फे दिले जाईल. येत्या 3 मार्च ला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्व मराठा समाजातील आजी माजी सरपंच,नगरसेवक,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तसेच सर्व पक्षाचे तालुका जिल्हा अध्यक्ष तथा राजकीय व्यक्ती यांनी आरक्षण मागणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पक्षाकडे जाऊ नका म्हणजे जातीच्या विरोधात जाऊ नका अन्यथा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मदतीला मराठा समाज येणार नाही असा ठराव संमत करण्यात आला याबाबत सर्व राजकीय पुढाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समन्वय समिती अहमदपूर यांच्या वतीने करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!