राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षनामध्ये उदगीर नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर

0
राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षनामध्ये उदगीर नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षनामध्ये उदगीर नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहर पाणी पुरवठा योजने अंतर्गत केंद्रशासना मार्फत मागील वर्षी विशेष पथकाव्दारे दोन वेळा उदगीर शहर पाणी पुरवठा प्रकल्पाची व उदगीर शहरातील पाणी वितरणाची तपासणी राष्ट्रीय पेयजल पथकाव्दारे करण्यात आली, त्यामध्ये उदगीर पाणी वितरण व्यवस्थापन, तीन जलशुध्दीकरण केंद्र, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवरील नळजोडणी, गळती, पिण्याचा पाण्याची टाकी, विद्युत विंधन विहीरी व हातपंप इत्यादी कामाची राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षण अंतर्गत कामाची गुणवत्ते बाबत तपासणी सर्वेक्षना अंती उदगीर नगर परिषदेचा पुरस्कार प्राप्त शहरामध्ये निवड झालेली आहे. ती उपरोक्त मानांकनाच्या आधारे झालेली आहे, उदगीर नगर परिषदेस दिनांक ०५ मार्च, २०२४ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार देवून गोरविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षना मध्ये उल्लेखणीय काम करणारे नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता सुनिल एस. कटके, तत्कालीन मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, नगर परिषदेचे प्रशासन तथा उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांचा सक्रीय सहभाग होता.
त्या अनुषंगाने ना. संजयजी बनसोडे, मंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हधिकारी, लातूर यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच शहरातील नागरीकांकडून व प्रतिष्ठत व्यक्ती कडून ही नगर परिषदेचे कौतक व अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!