शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला – आ. रमेशअप्‍पा कराड

शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला - आ. रमेशअप्‍पा कराड

लातूर (एल.पी.उगीले) : घटनेने ओबीसी समाजाला दिलेले आरक्षण राज्‍यातील शासनाच्‍या दुर्लक्षामुळे रद्द झाले आहे. रद्द झालेले आरक्षण सन्‍मानाने परत मिळवे, यासाठी भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने २६ जून २०२१ शनिवार रोजी जिल्‍हाभरात चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात येणार आहे. तेव्‍हा या आंदोलनात  ओबीसी समाजासह सर्वांनी हजारोंच्‍या संख्‍येनी सहभागी होऊन शासनाविरूध्‍द आक्रोश व्‍यक्‍त करावा. असे आवाहन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केले आहे.

आरक्षण हा समाजाचा नव्‍हे तर उपेक्षित ओबिसीच्या जिव्‍हाळयाचा प्रश्‍न आहे. छत्रपती शाहू महाराजांनी अप्रगत असलेल्‍या समाजाला पुढे आणण्‍यासाठी आरक्षण देवून सन्‍मान केला. मात्र राज्‍यातील महाविकास आघाडी शासनाच्‍या दर्लक्षामुळे,नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले. यामुळे येणाऱ्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या कोणत्‍याही निवडणूकीत ओबीसीचा उमेदवार दिसणार नाही. असे सांगून रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, घटनेने दिलेले आरक्षण ओबीसी समाजाला परत सन्‍मानाने मिळावे. यासाठी भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने लातूर जिल्‍हयातील सर्वच विधानसभा मतदार संघात चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात येणार आहे.

लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या आंदोलनात माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वात चक्‍काजाम आंदोलन होणार असून जिल्‍हाभरातील विविध ठिकाणच्‍या आंदोलनात त्‍या त्‍या भागातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी नेतृत्‍व करणार आहेत. लातूरसह सर्वच ठिकाणच्‍या  आंदोलनाची जय्यत तयारी करण्‍यात आली असून आपल्‍या न्‍याय हक्‍काच्‍या मागण्‍यासाठी ओबीसी समाजातील बांधवासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नागरीक हजारोंच्‍या संख्‍येने रस्‍त्‍यावर उतरणार आहेत. लातूरसह जिल्‍हाभरातील ओबीसीच्‍या प्रश्‍नावर होणारे चक्‍काजाम आंदोलन राज्‍यात लक्षवेधी व्‍हावे यासाठी अनेकजण मेहनत घेत आहेत.लातूर जिल्ह्यातील सुजान जनतेने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घ्यावा,असे आवाहन आ.रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!