जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी पानपोई सुविधा

0
जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी पानपोई सुविधा

जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी पानपोई सुविधा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योगपती जयवंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर शहर सुंदर शहर हरित शहर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी शहराच्या मध्यभागी असलेल्या राज्य मार्गाच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. दरवर्षी वृक्ष लागवड, अन्नदान तसेच ठीक ठिकाणी पाणपोईच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जयवंतराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने गोरगरिबांना अर्थसहाय्य करणे, अन्नदान करणे असे कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येतात. यावर्षी आणखी मोठ्या प्रमाणात सामाजिक जाणीवा जोपासत त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले. केवळ उदगीर शहरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातही अनेक कार्यक्रम घेऊन लोककल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबवल्या जात आहेत. ही अत्यंत कौतुकाची आणि अभिमानास्पद बाब आहे. उदगीर लगत असलेल्या देवणी तालुक्यातील येणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी देवणी बसस्थानक येथे पाणपोईची सोय करण्यात आली असून जून महिन्यापर्यंत पाणपोई चालू ठेवण्यात येणार आहे. या पाणपोईचे उद्घाटन उद्योगपती बिपिन जयवंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यशवंतराव पाटील, हवगिराव पाटील, शेषरावजी मानकरी, विजय कुमार लूले, भगवान बिरादार, दीपक मळभागे स्वामी, शिवाभाऊ कांबळे, श्रीमंतआना लुल्ले, योगेश तगरखेडे, करीम शेख, डी एल मेत्रे, तहसील कार्यालयाचे साळुंखे, बिजापुरे, पोलीस स्टेशनचे उत्सरगे, कांबळे, देवणी बसस्थानकाचे आगार प्रमुख पाटील, मेहत्रे व तालुक्यातील अनेक नागरिक या पाणपोई उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!