शालेय शिक्षणापासुन एकही विद्यार्थी वंचित राहायला नको

शालेय शिक्षणापासुन एकही विद्यार्थी वंचित राहायला नको

शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे
अमरावती (राम जाधव) : शाळेच्या पहिल्या दिवशीच शिक्षण सभापती आशिष कुमार गावंडे यांनी घेतल्या शाळेच्या भेटी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्‍या कहराने राज्यातल्या सर्वच शाळा बंद होत्या. ज्यामुळे जवळ जवळ सर्वच शाळा वसान झाल्यासारखे चित्र तयार झाले होते. परंतु आजब-याच महिन्यांनी कोव्हिड रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्याचे स्वागत सर्व शिक्षकांनी केले आहे. आज दिनांक २८ जून रोजी शाळा सुरू झाल्याबरोबर शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांनी शिक्षणाधिकारी डॉ.अब्दुल राजीक यांच्यासह मनपाच्या विविध शाळांना भेटी दिल्या. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा गाडगेनगर व उच्च प्राथमिक मनपा शाळा क्र.18 प्रविण नगर या ठिकाणी भेट दिली असता मुख्याध्यापक व शिक्षकांनी शिक्षण सभापतींचे पुष्प देऊन स्वागत केले व त्यानंतर आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शिक्षण सभापती यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. याच वेळी काही पालक वर्ग शाळेमध्ये आपल्या पाल्यांच्या अॅडमिशन साठी आपल्‍या पाल्‍यांसह उपस्थित झाले. तेव्‍हा या विद्यार्थ्यांना शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे व शिक्षणाधिकारी यांनी पुष्प देऊन स्वागत केले आणि पुस्तके व गणवेश वितरीत केले. नंतर शिक्षक व मुख्याध्यापकांची विद्यार्थ्यांच्या नवीन अॅडमिशन बाबत सखोल चर्चा करण्यात आली आणि शाळेच्या अभ्यासक्रमाबाबत व वार्षिक नियोजनाबाबत मुख्याध्यापकांकडून माहिती घेण्यात आली. आशिष गावंडे यांनी सर्वांना संबोधिले की, यावर्षी शाळे मधला किंवा शाळेच्या परिसरात राहणारा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नको. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या थेट घरापर्यंत संपर्क साधावा व शाळेची पटसंख्या वाढवावी. शाळेचे विद्यार्थी फाड फाड इंग्रजी बोलतील असे शाळेमध्‍ये नियोजन करावे.

यानंतर संपुर्ण शाळा इमारतीचे निरीक्षण करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. संध्या वासनिक, कु. मंजू वानखडे, चैताली टोपरे, योगिता निमजे, भाग्यश्री ढोमने, स्वाती घाडगे, वैशाली महाजन, मुख्याध्यापिका प्रीती बाराहाते, धीरज काळे, रेखा कांबळे, मनीषा गावणार व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!