भारतीय जनता पक्षातर्फे महाआघाडी सरकार चा निषेध

भारतीय जनता पक्षातर्फे महाआघाडी सरकार चा निषेध

भारतीय जनता पक्षाच्या निलंबित 12 आमदारांचे निलंबन परत घेण्याची  मागणी 
उदगीर (प्रतिनिधी) : अधिवेशन काळात काल ओबीसी आरक्षण साठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना भेटलेल्या भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन परत घ्यावे. याकरिता उदगीर येथे भारतीय जनता पक्षातर्फे उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात आले. अधिवेशन काळात तालिका अध्यक्ष यांच्या दालनात ओबीसी आरक्षण प्रश्नी भेटलेल्या  भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे 1  वर्षासाठी  निलंबन करण्यात आले. त्यांच्या वरील कार्यवाही ही लोकशाहीस मारक असून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. म्हणून उदगीर भारतीय जनता पक्षातर्फे या आघाडी सरकार चा निषेध करण्यात आला. 

यावेळी जेष्ठ नेते भगवान दादा पाटील तळेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगर परिषद अध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले,  भाजपा उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव धर्मपाल नादरगे,  भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल निडवदे,युवा मोर्चा शहराध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, पंडित सुकणीकर, उत्तराताई कलबुर्गे,भाजपा जिल्हा सचिव तथा नगरसेवक गणेश गायकवाड,पाणी पुरवठा सभापती  मनोज दादा पुदाले,भाजपा गटनेते बापूराव येलमटे, नगरसेविका अरुणाताई चिमेगावे,शिवकर्णा अंधारे, प्रा. पंडित सूर्यवंशी, नगरसेवक सावन पस्तापुरे, ऍड. दत्ता पाटील, नगरसेवक नागेश अष्टुरे, आनंद बुंदे, अमोल अणकल्ले,अजय पाटील माळेवाडीकर, वीरलाल कांबळे, आनंद भोसले, भाजपा महिला शहराध्यक्ष मधुमती कनशेट्टे, जया काबरा, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष संतोष बडगे,अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष  रवींद्र बेद्रे, आदींसह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!