वृक्षलागवड व संर्वधन ही काळाजी गरज  उपजिल्हाधिकारी श्री गणेश महाडिक 

वृक्षलागवड व संर्वधन ही काळाजी गरज  उपजिल्हाधिकारी श्री गणेश महाडिक 

लातूर (एल.पी.उगीले) : धनेगांव ता देवणी येथे आ. संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्ताने धनेगांव येथे स्मशान भुमी परिसरात वर्गमित्र आॅक्सिजन हब,  भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे यांच्या माध्यमातुन  वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन वृक्ष लागवड करण्यात आली आहे , या वृक्षलागवडीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी श्री गणेशजी महाडिक  व मनरेगा, बीडीओ श्री  महेंद्र कुलकर्णी यांनी भेट देऊन गावातील महादेव मंदीर परिसरात  करण्यात आलेली वृक्ष लागवड, व गांवअर्तगत  रस्ताच्या दुर्तफा  गतवर्षी लागवड करण्यात आलेल्या  वृक्षाची पाहणी करुन धनेगांव ग्रामस्थांनी  लोकसहभागातुन  ही  वृक्ष लागवड करुन त्याचे संर्वधन  केल्याबद्ल अभिनंदन केले. यावेळी बोलताना  श्री महाडिक  म्हणाले की, आज जर  आपण एकूण सारासार विचार  केला तर पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने, झाडे ही  अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोटय़ा-छोटय़ा वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करतेे, आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उर्त्सजन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी स् आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते.  लातुर येथील शेतकर्‍यानी व्यवसाईक शेतीकडे वळावे, यामध्ये बांबू, फळलागवड ,याकडे प्रामुख्खाने लक्ष द्यावे. यामुळे वृक्षलागवड ही होईल व शेतकर्‍यानां यामाध्यमातुन रोजगार ही उपलब्ध होईल. 

यावेळी देवणीची तहसिलदार श्री सुरेशजी घोळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अच्युत पाटील, सरपंच पती श्री हरिभाऊ परीट, उपसंरपंच श्री रविद्रकुमार पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे, ग्रामसेवक श्रीकात पताळे, श्री बाळासाहेब बिरादार, श्री दिपक पवार, श्री लक्ष्मण पवार, श्री सखाराम चव्हाण, श्री अनिल राठोड, श्री अमित बिरादार,श्री बालाजी बिरादार, श्री शंकर आपटे, श्री ज्ञानेश्वर बिरादार, आदिसह ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!