सिद्धी शुगर कारखान्याच्या चौकशीची मागणी

सिद्धी शुगर कारखान्याच्या चौकशीची मागणी

शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देण्यात यावा अन्यथा कारखान्यासमोर आत्मदहनाचा इशारा – माजी मंत्री विनायकराव पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : या भागातील शेतकऱ्यांना जीवदान देणारा, कल्पवृक्ष असलेला बालाघाट साखर कारखाना उसाअभावी व अवर्षणामुळे पूर्ण क्षमतेने चालू शकला नाही. त्याला कर्जबाजारीपणामुळे अवसायनात काढून कमी किंमतीला विकण्यात आला आहे.शेतकऱ्यांचे दैवत असलेला हा बालाघाट साखर कारखाना होता.शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देण्यात यावा, विक्रीची चौकशी करण्यात यावी, या भागातील शेतकऱ्यांचा ऊस अगोदर देण्यात यावा अन्यथा येत्या गळीत हंगामा पासून कारखान्यासमोर शेतकर्‍यांना सोबत घेऊन आत्मदहनाचा इशारा माजी मंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला. रोकडोबा जिनिंग अंड प्रेसिंग येथील पत्रकार परिषदेसाठी भाजपा प्रवक्ते गणेश हाके, हरिभाऊ येरमे, गोविंद गिरी, कमलाकर पाटील, विठ्ठलराव बोडके, संग्राम चामे, रामभाऊ नरवटे, चंद्रजित पाटील, हनुमंत देवकते, निळकंठ पाटील, शिवराज पाटील, सुखदेव कदम सह भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या तालुक्यातील उजना येथील बालाघाट साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांनी आपली जमीन खूपच कमी किमतीला दिली आहे. एकूण 287 एकर तेथे जमीन असून तो 2500 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला साखर कारखाना असल्याचे सांगून ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी 3000 रुपयांना शेअर्स घेतले होते. यांचेही पैसे परत मिळालेले नाहीत.या सभासद शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. या भागात कारखाना झाला. पण पाणी उपलब्ध नसल्यामुळे ऊसाचे क्षेत्र फार कमी होते. पाणी उपलब्ध नसल्यामुळे हा कारखाना व्यवस्थित चालू शकला नाही. या भागात शेतकऱ्यांना जीवनदान देणारा कल्पवृक्ष असलेला कारखाना व्यवस्थित चालावा या भागात हरित क्रांती व्हावी म्हणून या जिल्ह्याचे सुपुत्र तथा त्या वेळचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सहकार्यानेच मतदार संघात 42 ते 48 साठवण तलाव आपण काढल्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सांगितले. तसेच बालाघाट साखर कारखाना लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या सहकार्यामुळेच आपण सुरू केल्याचे माजी मंत्री पाटील यांनी सांगितले. बालाघाट साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी दैवत व मंदिर असून शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देण्यात यावा, सिद्धी शुगर ने अगोदर कार्यक्षेत्रातील ऊस घेऊन जावा व नंतरच बाहेर चा ऊस घेण्यात यावा, शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याने बदल नाही केल्यास व एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना भाव नाही दिल्यास, रक्कम वेळेवर नाही दिल्यास, येत्या गळीत हंगामा पासून आपण शेतकऱ्यांसह कारखान्यासमोर उपोषण करून आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला.

यावेळी भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी बोलते वेळी म्हणाले की आम्ही माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांना घेऊन कारखान्याच्या समोर उपोषण करणार आहोत. यासाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्ण सहकार्य माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे राहणार असल्याचे यावेळी सांगितले. येथील उपविभागीय अधिकारी यांना सिद्धी शुगर च्या चौकशीचे निवेदनही देण्यात आली आहे.

About The Author

error: Content is protected !!