शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सुरक्षा वाढवावी – मराठवाडा पालक संघाची मागणी

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सुरक्षा वाढवावी - मराठवाडा पालक संघाची मागणी

लातूर (प्रतिनिधी) : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक आदर्श शिक्षणमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून शिक्षण क्षेत्राला त्यांची खूप गरज आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री असल्याने त्या दोन दिवसांपूर्वी हिंगोली दौर्‍यावर गेल्या असता, त्यांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिली. सुदैवाने यात त्यांना कसलीही दुखापत झाली नाही. तरीही भविष्यात दुर्दैवाने कसलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी ना. वर्षा गायकवाड यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी मराठवाडा पालक संघाच्यावतीने अध्यक्ष डॉ. भारत घोडके व सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याचा शैक्षणिक दर्जा आणखीन कसा वाढेल यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या पुढाकार घेत असून त्यांचे कार्य उल्लेखनीय असे आहे. मागच्या काळात कोरोनाने राज्यभरात थैमान घातले होते. अशा कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून ना. गायकवाड यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु केली. याबाबत त्या वेळोवळी त्यांनी शिक्षण संचालक, अधिकारी व संस्थाचालक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला व ऑनलाईन शिक्षण प्रणालीबाबत येणार्‍या अडचणींची सोडवणूक केली. विना अनुदानित शिक्षकांना अनुदान दिले. आगामी काळातही विद्यार्थ्यांना कसलीही अडचण येवू न देता त्यांचे शिक्षण पूर्ववत करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने राज्यातील शिक्षण क्षेत्राला ना. वर्षा गायकवाड यांची गरज आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री म्हणूनही त्या अतिशय उत्तम कामगिरी बजावत आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी ना. गायकवाड हिंगोली दौर्‍यावर गेल्या असता, बैठका व इतर शासकीय कार्य उरकून त्या पुढे रवाना होण्यासाठी निघाल्या तेव्हा त्यांच्या वाहनाला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. सुदैवाने यात त्यांना कसलीही इजा झाली नाही. तरीही भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी मराठवाडा पालक संघाचे अध्यक्ष डॉ. भारत घोडके व सचिव तथा लातूर जिल्हा संस्थाचालक संघाचे कोषाध्यक्ष प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!