केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला – विजय निटुरे

केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला - विजय निटुरे

उदगीर (एल.पी.उगिले) : केंद्र सरकारने अच्छे दिन च्या नावाने सत्ता मिळवली, मात्र त्यानंतर गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडून महागाईचा भस्मासुर त्यांच्या पाठीमागे लावला. अशी कडक प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयभैय्या राजेश्वर निटुरे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध सायकल रॅली काढली होती. सायकल रॅलीला संबोधून ते बोलत होते. संपूर्ण देशात आता केंद्र सरकारच्या विरोधामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत चाललेली आहे. वारंवार इंधनाचे दर वाढत असल्याने महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात अगोदरच कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर लावलेल्या सततच्या लाॅकडाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांचे उद्योग धंदे बंद झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेलेले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना जगणे असह्य झालेले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल आणि घरगुती गॅसचे दर तात्काळ कमी करून महागाई नियंत्रणात आणावी. अशीही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा नेते विजय भैया राजेश्वर निटुरे यांनी केली आहे.

काँग्रेस पार्टीच्या वतीने इंधनवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहरातून सायकल रॅली काढण्यात आली, यावेळी उपजिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात केंद्रातील भाजप सरकारने महागाई कमी करण्याचे खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवले आहे. भाजपच्या काळात पेट्रोल-डिझेल नी 100 आकडा पूर्ण केला आहे. घरगुती गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे बजेट कोसळले आहे. वारंवार इंधन दरवाढ होत असल्याने याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविल्या जात आहेत. हातावर पोट असणाऱ्या कामगारांची उपासमार होण्याची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. हे तात्काळ कमी करावेत. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सायकल यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयभैया राजेश्वर निटुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर खाॅं पठाण, विधानसभा युवक अध्यक्ष अमोल कांडगिरे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, मधुकर एकुर्केकर, अमोल घुमाडे, विजय चवळे, बालाजी पाटील, अनिल मुदाळे, शिवाजी देवनाळे, माधव कांबळे, नंदकुमार पटणे, लक्ष्मण सोनवळे, धनाजी मुळे, संतोष वळसने, ज्ञानेश्वर भांगे, रविकांत पाटील, महेंद्र पाटील, राहुल सातापुरे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!