शेतकरी संघटनेचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन

शेतकरी संघटनेचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन

लातूर (प्रतिनिधी) : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत लाभधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना नियमबाह्य व्याज आकारणी तसेच वसुली नंतरही कर्जमुक्तीचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण कर्जमुक्तीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले.जिल्हा उपनिबंधकांनी त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्ह्यातील काही बँकांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभधारकांच्या कर्जावर नियमबाह्य व्याज आकारणी करत रकमा वसूल केल्या. या लाभधारकांना पुन्हा कर्ज वाटपही केले नाही, अशा अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. यासंदर्भात राजेश सोळंके, महेश सोळंके, नरसिंग जाधव,ज्ञानेश्वर सगर, चंद्रकांत पाटील, प्रल्हाद बरकते यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी त्या-त्या बँकांकडे तसेच जिल्हा अग्रणी बँकेकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. विशेषतः आयसीआयसीआय बँक व ओरिएंट बँकेच्या शाखांकडून कर्जमुक्ती योजनेतील लाभधारकांवर अन्याय केला जात असल्याचे संघटनेचे म्हणणे होते.
अनेक शेतकरी चालू बाकीत असताना त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने केलेली होती.अनुदान तर मिळालेच नाही पण वसुलीसाठी बॅंकांनी तगादा लावला. त्यामुळे बुधवारी (दि.१४ जुलै )सकाळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुलुप ठोको आंदोलन केले.यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनानंतर जिल्हा उपनिबंधकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र देवून या दोन्ही बँका जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे सांगितले. कर्जवाटप व कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना एक महिन्याच्या आत देण्यात येतील.कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी संघटनेने दिली तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येईल, असे आश्वासनही या पत्राद्वारे देण्यात आले.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात उपाध्यक्ष बाबाराव पाटील, युवा कार्याध्यक्ष बालाजी जाधव, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष किशनराव शिंदे, देवणी तालुकाध्यक्ष केशव धनाडे,उदगीर तालुका अध्यक्ष कालिदास भंडे, रेणापूर तालुकाध्यक्ष समाधान क्षिरसागर, विठ्ठल संपते,दगडू पडीले, विठ्ठल गोरे, तुकाराम आळंदकर, विलास आळंदकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!