संत नामदेव विद्यालयाची दहावी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

संत नामदेव विद्यालयाची दहावी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

लातूर (प्रतिनिधी) : मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत लातूर येथील संत नामदेव विद्यालय शाळेचा निकाल 100% लागला आहे.

2021 च्या दहावी बोर्ड परिक्षेसाठी संत नामदेव विद्यालयातून एकूण 239 विद्यार्थी परीक्षेसाठी समाविष्ट झाले होते. त्यापैकी विद्यालयातील 90% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 31तसेच विशेष प्राविण्यासह 193 विद्यार्थी व 44 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यात जाधवर दिशा मनोहर या विद्यार्थिनीने 100% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. तसेच केंद्रे प्रवीण 99.60, बेंबडे नेहा 98.60, बेंबडे निकिता 98.40, केंन्द्रे दिशा 97.60, गडर अजिंक्य 95.60, सुरवसे अंकिता 94.60, तिडके गणेश 94.00, जटाळ वैभवी 94, साळुंके गणेश 93.80, गरड श्रीनिवास 93.80, ओमकार जाधव 93.60, नेहरकर साईराज 93.20, पांचाळ सायली 92.80, प्रसाद कृष्णकुमार 92.60, ऋषिकेश घुगे 92.60, मुंडे पायल 92.20, साळुंके वेदांत 92.20, पेदे संगमेश्वर 92, मंगुळे अनुज 92, पवार साक्षी 91.60, गणेश इंगोले 91.20, चव्हाण रविराज 91, मुंडे प्रशांत 90.80, गिरी शंतनू 90.80, जाधव हर्षवर्धन 90.60, गीते शरद 90.60, केंद्रे विश्वजीत 90.40, लहाने ज्ञानेश्वर 90. 40, राठोड सुरज 90.40, माने गीतांजली 90 टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव शिवाजीराव परगे, जिल्हा परिषद सदस्य सौ. अनिताताई शिवाजीराव परगे, मुख्याध्यापक श्रीमती बी एस, बोबडे आर एस, मुंजेवार, आयनुले, लव्हराळे, गरड, शिंदे, मोरे, चिंताडे, चिगुरे, दत्तनुरे, पाटील सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!