लोक कल्याणकारी योजना राबवण्याची क्षमता भाजपा मध्येच – देशमुख 

लोक कल्याणकारी योजना राबवण्याची क्षमता भाजपा मध्येच - देशमुख 

लातूर (एल पी उगीले) : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणे आणि लोकांचे प्रश्न सोडवत असताना त्यांच्या हिताचे निर्णय घेणे. ही क्षमता भारतीय जनता पक्षातच आहे असे उद्गार भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीलीपराव देशमुख यांनी काढले.

 ते चापोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते. चापोली ग्रामपंचायतची वतीने आ. रमेश अप्पा कराड आणि दीलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, प्रा तुकाराम गोरे, प्रा विजय क्षीरसागर, उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंद नरहरे, सतीश आंबेकर, जिपचे माजी सदस्य तुकाराम मद्ये, ऍड सुधाकर जगताप, रमेश पाटील, चेअरमन बालाजी शेवाळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव, ज्ञानोबा वाघमारे, माजी चेअरमन भाऊसाहेब होनराव, दत्तात्रय कुलकर्णी, महेश कांबळे, बसवेश्वर मुर्गे ,माजी उपसरपंच जिलानी शेख, शांतप्पा गादगे, बालाजी कासले, महालिंग होनराव, रमाकांत होनराव, साई हिप्पळगे, रुद्र होळदांडगे, द्वारकानाथ गोरगीळे, नारायण जामकर, संदीप आंबदे, चांद शेख, युनुस मोमिन, वीरभद्र स्वामी, शंकर चाटे, माऊली चाटे, अतुल जंपनगिरे, बसवराज स्वामी, व्यंकट चाटे ,बालाजी कांबळे, नामदेव पांचाळ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे ध्येयधोरणे हे जनसामान्यांच्या हितासाठी असून लोकहिताची प्रत्यक्ष नियोजन करून अंमलबजावणी करनण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टी कडेच आहे. आदर्श तत्व आणि तत्वनिष्ठ कार्यकर्ते यामुळे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात सत्तेत राहील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश आप्पा कराड यांनीदेखील सत्काराला उत्तर देताना येणाऱ्या काळातील सर्वच आघाड्यांवरील सत्ता भारतीय जनता पक्षाकडे राहिल. असा विश्वास व्यक्त केला.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!