महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारत रत्न’ उदगीरमध्ये जल्लोष

0
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारत रत्न’ उदगीरमध्ये जल्लोष

उदगीर (एल.पी.उगीले)
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर झाल्याच्या आनंदात उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर यांच्या वतीने करण्यात आले होते. अनेक समाजबांधव आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेच्या कार्यात दिलेल्या भरीव योगदानामुळे त्यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीला अखेर यश आल्याने संपूर्ण राज्यभर आनंदाचे वातावरण आहे. या अनुषंगाने उदगीर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जल्लोष साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच, उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.
या आनंदोत्सवात सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले, प्रबोधन कीर्तनकार तथा ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ डॉ. शरदकुमार तेलगाने, बालाजी कांबळे, सुरेंद्र आक्कनगिरे, चंद्रकांत मोरे, मोहनराव खिंडीवाले, हनुमंत शेळके, शिवाजी सूर्यवंशी, सोमनाथ गुरदाळे, विमलताई मदने, शोभाताई श्रीमंगले, बालाजी फुले, बाबुराव आंबेगावे, धूळप्पा मलचापुरे, यशवंत बारस्कर, शंकर सूपनोरे, बालाजी तेलंगे, राजू कासले, विठ्ठल लुटे, अनिल मुधाळे आदींसह अनेक ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार जाहीर होणे, ही सामाजिक न्यायाची विजयगाथा असल्याचे मत व्यक्त केले.
समाजसुधारकांना मिळाले न्यायाचे प्रतीक!
महात्मा फुले यांनी शेतकरी, कामगार, ओबीसी आणि सर्व सामान्य समाजासाठी आयुष्यभर लढा दिला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘भारत रत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळाला, याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.
उदगीरमध्ये ओबीसी समाजाचा एकजुटीचा संदेश या सोहळ्यात ओबीसी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या निर्णयामुळे सर्व समाजघटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजसुधारकांचा सन्मान हा संपूर्ण समाजाचा सन्मान आहे, असा सकारात्मक संदेश दिला गेला.
आनंदोत्सवाच्या निमित्ताने ओबीसी समाजाची एकजूट दृढ उदगीर शहरात साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवामुळे ओबीसी समाजाची एकजूट अधिक दृढ झाली असून, समाजहितासाठी सर्वांनी एकत्र यावे, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!