पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी. उगीले)
श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकरावजी बेंबडे यांनी नियमित उपस्थिती व अभ्यासातील सातत्य हेच यशाचे मूलमंत्र असून त्याचे अवलोकन करून आपले भविष्य उज्वल करावे असा मोलाचा संदेश दिला. प्रमुख मार्गदर्शक केंद्रे डी. पी. यांनी महाराष्ट्र ही मानवी रत्न घडवणारी भूमी आहे. तुम्हीही शिक्षणातून महाराष्ट्राला योगदान द्यावे. असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी वर्गातील पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. इसमालपूर येथील प्रतिष्ठित नागरिक अशोकराव पाटील याप्रसंगी उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी वर्गाचे निकाल घोषित करून मान्यवरांच्या हस्ते प्रगती पत्रकाचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.