अल-अमीन माध्यमिक विद्यालयाचा गौरवशाली निकाल शंभर टक्के

उदगीर (एल पी उगिले) शैक्षणिक क्षेत्रात सदैव अग्रस्थानी राहणाऱ्या अल-अमीन माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या फ़ेब्रू.25 इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये पुन्हा एकदा आपल्या गुणवत्ता व यशाची परंपरा कायम राखत सेमी इंग्रजी व उर्दू या दोन्ही माध्यमांतून शंभर टक्के निकाल नोंदवला आहे. हे यश केवळ आकड्यांपुरते मर्यादित नसून, त्यामध्ये विद्यार्थ्यांची अथक मेहनत, शिक्षक वर्गाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे नियोजन यांचे उत्तम समन्वयाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते.
यंदा सेमी इंग्रजी माध्यमातून सय्यदा यशफ़ीन सय्यद शोएब हिने 94.20% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाने केवळ विद्यालयाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.
उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांपैकी शेख मायशा नाजिम हिने 92.80% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या मागोमाग खान आमेर इस्माईल याने 88.20% गुणांसह तृतीय, पटेल मेराज अबुजर हिने 87.20% गुणांसह चतुर्थ आणि खान मारिया मुजीबुर रहमान हिने 85% गुण मिळवत पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
विद्यालयाच्या यशामध्ये केवळ शैक्षणिक परीणाम नव्हे, तर सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या व्यवस्थापना चे देखील मोठे योगदान आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययना सोबतच संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि समाजाभिमुख दृष्टीकोन यांचाही समावेश असलेले शिक्षण दिले जाते. त्यामुळे येथे घडणारा प्रत्येक विद्यार्थी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वासाने उभा राहू शकतो.
विद्यालयाचे प्राचार्य ग़ुलाम ग़ौस खान यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत,”हे यश हे विद्यार्थ्यांच्या कष्टाचे, पालकांच्या विश्वासाचे आणि शिक्षकांच्या परिश्रमाचे फळ आहे,” असे उद्गार काढले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.
अल-अमीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. इसा खान, सचिव शेख मोहम्मद अकबर, सहसचिव हाशमी सलीम आणि कोषाध्यक्ष शेख क़यामोद्दीन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
अल-अमीन विद्यालयाचा हा निकाल केवळ एक यश नसून प्रेरणास्त्रोत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा ठरतो आहे.
हा निकाल हे स्पष्टपणे दर्शवतो की, प्रतिबद्धता, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर कोणतीही शैक्षणिक संस्था गुणवत्ता आणि यशाचा उच्चांक गाठू शकते.