संघर्षातून काहीही प्राप्त होत नाही -डॉ. शिवाजी सगर

उदगीर (एल पी उगिले)
संघर्षातून कधीही कोणाला काहीही प्राप्त होत नाही. प्रेमाने जग जिंकता येते. जगाला शांतीची आवश्यकता आहे, आणि हे गौतम बुद्धाच्या विचारात दिसून येते, म्हणून असे म्हटले जाते जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. जीवन जगत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि प्रेम या अनुषंगाने जगलेले जीवन हे समाधानकारक असू शकते. मोबाईल मधून वाचन केल्यास ते स्मृतीत दीर्घकाळ टिकत नाही. पुस्तक वाचनातून ज्ञान, शब्द संपत्ती व शब्दातील संवेदना समजतात असे प्रतिपादन डॉ. शिवाजी सगर यांनी केले. उदगीर शहरातील आनंदी मॉर्निंग ग्रुप चे सर्व सदस्य यांनी कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित केलेल्या “चला मैत्री करू या पुस्तकाशी” या कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते. त्यांनी स्वलिखित पुस्तके महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट केले.
याप्रसंगी संस्थेच्या कोषाध्यक्ष मृदुलाताई पाटील, रंगराव ज्ञानोबा मोरे, पत्तेवार अनिल वसंतराव, कुरेशी शौकत अली, प्रा. प्रवीण प्रभाकर जाऊरे, मुरलीधर दिगंबर जाधव, गणपत नखाते, मुंदडा कचरूलाल बन्सीलाल, शेख अब्दुल हकीम, दीपक बनसुर्य, रामभाऊ बाजीराव जाधव, प्रकाश कृष्णप्पा बिरादार, अब्दुल गफूर मो. सरोवर, उपस्थित होते. उपस्थित आनंदी ग्रुप मधील सर्व सदस्यांचे संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील यांनी आभार मानले.