“ऑपरेशन सिन्दुर”गाजवणाऱ्या सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली

उदगीर (एल.पी. उगीले) पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने राबवलेल्या सिंदूर ऑपरेशनच्या समर्थनार्थ व तिन्ही दलाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रम, त्याग व शौर्य याचा सन्मान करण्यासाठी उदगीर शहरात छत्रपती शाहू महाराज चौकापासून तिरंगा यात्रा काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला. या रॅलीच्या वेळी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शाहू महाराज चौकापासून ते मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहीद कॅप्टन कृष्णकांत चौक येथे अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी प्राधान्याने शिवानंद हैबतपुरे, बसवराज बागबंदे, उत्तरा कलबुर्गे, राहुल केंद्रे, विजय पाटील, ॲड. बसवराज पाटील कोळखेडकर, बसवराज रोडगे, विजय निटुरे, शिवाजी भोळे, रोहिदास गंभीरे, अमोल निडवदे ,दिलीप मजगे, अमोल अंणकल्ले, सतीश पाटील, महादेव घोणे, साईनाथ चिमेगावे, शामला कारामुंगे, मंदाकिनी जीवने, ॲड. भाऊसाहेब जांभळे, गणेश गायकवाड, चंद्रकांत बिरादार, संगम अष्टुरे, संजय पाटील, रामेश्वर चांडेश्वरे, बबीता पांढरे, गिरीश पाटील, प्रसाद नाईकवाडे, मनोहर भंडे यांच्यासह उदगीर शहर आणि तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.