लातूर जिल्हा बँकेत शेतकऱ्यांनी भरला २४ कोटी रुपयांचा पिक विमा

लातूर जिल्हा बँकेत शेतकऱ्यांनी भरला २४ कोटी रुपयांचा पिक विमा

राज्यात लातूर बँक पिक विमा भरून घेण्यात अव्वलस्थानी

लातूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१ योजनेअंतर्गत जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १११ शाखेत तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांनी २३ कोटी ४२ लाख रुपयांचा विम्याचा हप्ता भरणा केलेला असून त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाभरात शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवरील सोसायटी कार्यालयात पिक विमा भरून घेतला होता  राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कोविड १९  काळात सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांच्या गावातून पिक विमा भरून घेवून राज्यात लातूर जिल्हा बँकेने नवा पॅटर्न निर्माण केला आहे हे विशेष आहे दरम्यान जिल्ह्यांत पिक विमा भरण्यासाठी कुठलीही तक्रार न करता सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचारी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या गावातून पिक विमा स्वीकारलेला आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असून  गेल्या वर्षी कोवि ड ची परीस्थिती असताना लोकांच्या मदतीला बँक धावून गेली होती पुन्हा यावर्षी पिक विमा रक्कम भरण्यासाठी त्यांच्या गावात जावून विमा रक्कम स्वीकारली आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेली लातूरची जिल्हा बँकेने  एक वेगळेपण जपले आहे  बँकेच्या माध्यमांतून मुख्यालयातील अनेक अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागातील नियुक्त केले होते त्यामूळे लोकांना पिक विमा भरून घेण्यासाठी कुठलाही त्रास होऊ दिला नाही त्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव सर्व संचालक मंडळाच्या यांच्या सूचनेनुसार अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत.

*जिल्ह्यात तालुका  व्हाइज पिक विमा भरलेली रक्कम व शेतकरी सभासद याप्रमाणे आहेत*

(१)लातूर तालुका पिक विमा रक्कम (३ कोटी २९ लाख ९२ हजार रुपये)  शेतकरी सभासद ३४ हजार २९,
(२) रेणापूर तालुका रक्कम (१ कोटी ३० लाख ८ हजार रुपये) शेतकरी सभासद १४ हजार ७४६
(३) औसा तालुका  रक्कम(३ कोटी ६६ लाख ८९ हजार ) सभासद ४४ हजार ३४.
(४) निलंगा तालुका रक्कम (३ कोटी ५३ लाख ८९ हजार) सभासद संख्या ४४ हजार ७५८
(५)  चाकुर तालुका रक्कम (३ कोटी १३ लाख ८५ हजार) सभासद संख्या ३७ हजार ५९
(६) अहमदपूर तालुका रक्कम (२ कोटी ४१ लाख ५६ हजार) सभासद संख्या २१,१८८
(७) उदगीर तालुका रक्कम (२ कोटी ७२ लाख ६० हजार) सभासद संख्या २५ , ३०३
(८) देवणी तालुका रक्कम ( १ कोटी २० लाख ८५ हजार) सभासद संख्या १३, हजार ८३९
(९) जळकोट तालुका रक्कम (८० लाख ८८ हजार रुपये) सभासद संख्या १० हजार ५६०
(१०) शिरूर अनंतपाळ तालुका रक्कम (१ कोटी ३१ लाख ८० हजार रुपये)  शेतकरी सभासद १५ हजार ६५१  अशा एकूण २ लाख ६१ हजार १६८ शेतकऱ्यांनी २३ कोटी रुपये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत २३ जुलै अखेर बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून भरणा केला अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांनी दिली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!