सर्वसामान्याला शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध – राम बोरगावकर

0
सर्वसामान्याला शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध - राम बोरगावकर

उदगीर (एल पी उगिले) :- उदगीर तालुक्यातील भाकसखेडा येथे ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच अर्चना खेडकर या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उदगीर चे तहसीलदार राम बोरगावकर हे उपस्थित होते. आपले विचार मांडताना त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य पर्यंत शासकीय योजना निकषात बसणारे पात्र लाभार्थी यांना कसे मिळतील, याकडे ग्रामीण भागात काम करणारे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी लक्ष देऊन त्यांना लाभ कसा मिळेल या बाबीची पूर्तता करावी. कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. कारण आम्ही योजनेचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाकसखेडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी घरकुल असो किंवा कृषी च्या विविध योजना असो, नरेगा स्वच्छ भारत मिशन, पशुसंवर्धन तसेच वैयक्तिक लाभाचे अनेक प्रकल्प शासनाचे असून जनतेने त्याचा परिपूर्ण लाभ घ्यावा, असे सांगितले.ग्रामीण भागातील जी यंत्रणा आहे त्यांनी यासाठी काम करावे असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील शेतकरी यांनी ॲग्री स्टॅग मध्ये भाग घेऊन शंभर टक्के आपले सर्व शेतकरी खातेदार फार्मर आयडी काढून घ्यावेत, अन्यथा यापुढे शासनाच्या संपूर्ण योजना मिळणार नाहीत. त्यासाठी ॲग्री स्टॅग करणे जरुरीचे आहे. असे राम बोरगावकर यांनी सांगितले.
ग्राम दरबाराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय भाकसखेडा यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी सुरेखा नामवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका जाधव, विस्तार अधिकारी पंचायत अंकुश बिरादार, विस्तार अधिकारी संख्यांची विवेक स्वामी, विस्तार अधिकारी कृषी विजयकुमार अजने, बालाजी भांगे विस्तार अधिकारी आरोग्य मनोहर जाधव, विस्तार अधिकारी स्वच्छ भारत मिशन भागवत टेकाळे, अभियंता बालाजी जाधव, कृषी सहाय्यक मोरे, ग्रामसेवक नरेंद्र पांचाळ, महिला व बालकल्याण च्या प्रतिनिधी पृथ्वी कंठे, घरकुल तपासणीस किशोर भत्ताडे, नरेगा विभागाचे अविनाश ढवळे, ग्रामसेवक संतोष माचे, भाकसखेडा गावाच्या सरपंच अर्चना खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे ग्रामपंचायत सदस्य गुलाब पठाण, मैनाबाई जाधव, भाग्यश्री जाधव, विजय बुरले, माधव टेकपुंजे, उद्धव कांबळे, नरसिंग जाधव, श्रीधर पाटील, सत्यवान जाधव, भगवंत जाधव, माधव जाधव, विठ्ठल जाधव, दत्ता जाधव, सतीश जाधव, एकनाथ जाधव, त्रिंबक कांबळे, तानाजी जाधव, आनंदराव कांबळे, गोरख कांबळे, नामदेव जाधव, अशोक कांबळे, रंजीता कांबळे, मीरा शिंदे, यांच्या मिरा कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक नरेंद्र पांचाळ यांनी केले. व कृषी सहाय्यक मोरे यांनी उपस्थिताचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!