आयपीडीएस योजनेअंतर्गत प्रलंबीत कामे तातडीने पूर्ण करा!

आयपीडीएस योजनेअंतर्गत प्रलंबीत कामे तातडीने पूर्ण करा!

महावितरणचे संचालक यांच्या कडे युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची मागणी…!
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात विद्यूत विभागाचे विविध कामे आयपीडीएस योजनेंतर्गत मंजूर असून सूध्दा अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमूळे प्रलंबीत असलेले कामे तातडीने सूरूवात करावेत अशी आग्रही मागणी युवकनेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी महावितरणच्या पायाभूत अराखडा विशेष प्रकल्पाचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांची भेट घेवून एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड येथील कार्यालयामध्ये नूकतीच त्यांची भेट घेवून मागणीचे सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात पूढे म्हटले आहे की,अहमदपूर शहराचा वाढ व विस्तार मोठ्या झपाट्याने झाला असून त्या प्रमाणात महावितरणच्या सुविधा अपुऱ्या आहेत. महावितरणच्या वतीने (आयपीडीएस) एकात्मिक उर्जा वितरण योजनेअंतर्गत शहरातील अनेक कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे मंजूर झालेल्या निधीपैकी अर्धे अधिकच कामे पूर्ण झाले आहेत. योजनेत मंजूर असलेले बाकीचे सर्व कामे वेळेवर पूर्ण न करता चक्क रद्द करण्यात आलेले आहेत. संबंधित अधिकारी या प्रकरणी उडवाउडवीचे उत्तर देत असून आता ही योजनाच बंद झाली आहे. निधी परत गेला आहे आता निधी उपलब्ध होऊ शकत नाही अशा पद्धतीचे उत्तरे देत आहेत.
कूठलिही योजना यशस्वी पणे राबविण्याची जबाबदारी ही संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांची आहे.मात्र संबंधितांच्या अक्षम्य दुर्लक्षामूळे योजनेअंतर्गत शहरात नव्याने लागणारे विद्युत पोल, वीजवाहिन्या, ट्रांसफार्मर इत्यादी कामे प्रवंबीत राहीले आहेत. ही सर्व प्रलंबीत सर्व कामे झाल्यास महावितरणला विज वितरणाची सूलभ सोय होणार असून नागरिकांना यातून सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे खास बाब म्हणून मंजूर असलेली सर्व कामे पुनरुज्जीवित करून ही कामे पूर्ण करावेत व शहराला महावितरणच्या वतीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.

एकूणच अहमदपूर शहराच्या नवीन भागात तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोल बसविणे, नवीन विद्यूत तार ओढणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविने इत्यादी कामे प्रलंबीत असून कूठल्याही परिस्थितीत ही कामे होणे गरजेचे आहे तरच खर्या अर्थाने नागरीकांना सुलभ सेवा मिळू शकेल असेही शेवटी डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी म्हटले असून निवेदनाच्या प्रती उर्जामंत्री, महावितरण चे कार्यकारी संचालक यांना देण्यात आल्या आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!