शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी डॉ. तेलगाने काम करतील –बस्वराज रोडगे

0
शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी डॉ. तेलगाने काम करतील --बस्वराज रोडगे

उदगीर (प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक लोक कल्याणकारी योजना अजूनही लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. काही योजना खरोखरच समाजाच्या हिताच्या असून त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच शासनाने राबवलेले विविध लोककल्याणकारी उपक्रम देखील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने उदगीर तालुक्यातील विशेष काम करण्याची योजना आखली जात असून “हर घर मोदी, घर घर मोदी”भूमिका घेऊन मोदी सरकारने केलेली कामे लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न डॉ. शरदकुमार तेलगाने हे करतील. असे मत भाजपचे जेष्ठ नेते तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस बस्वराज रोडगे यांनी व्यक्त केले. ते डॉ.तेलगाने यांच्या ओम हास्पिटल या ठिकाणी डॉक्टर डे च्या निमित्ताने व डॉ. तेलगाने यांची राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे उदगीर तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कारप्रसंगी बोलत होते.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब जाभळे, भाजयुमो चे जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत बिरादार, मनोज साकोळकर ई उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. तेलगाने म्हणाले की, स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने समाजसेवेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. ही भावना ठेवून “धर्मो रक्षति रक्षत:” या विचाराने प्रेरित होऊन धर्म आणि कर्म यांची सांगड घालून कार्यरत असलेले भाजप सरकार ज्या लोककल्याणकारी योजना राबवत आहे, त्या योजनांची माहिती प्रत्येकाला झाली पाहिजे. जेणेकरून विरोधकांच्या अफवा आणि अपप्रचाराला सर्वसामान्य माणूस बळी पडणार नाही. त्यादृष्टीने राष्ट्रीय मोदी सेवा समिती निश्चितच सक्रियपणे कार्य करेल. असा मला विश्वास आहे. त्यासाठी आपण संघटन उभा करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. शरद कुमार तेलगाने यांना शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. शरद तेलगाने पूर्ण ताकतीनिशी कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!