शिक्षण व संस्कृती जपण्याचे काम जेएसपीएम संस्थेकडून होत आहे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

शिक्षण व संस्कृती जपण्याचे काम जेएसपीएम संस्थेकडून होत आहे - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगवत्गिता, कुराण, बायबल, रामायण हे धार्मिक ग्रंथ महत्त्वाचे आहेत. यातून जे आवश्यक आहेत ते आपण घ्यावे. अन् त्याच विचारावर आपली वाटचाल यशस्वीपणे करावी. हीच परंपरा कायम ठेवत जेएसपीएम संस्थेनेही अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारीत शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. यातून नितीमुल्य, शिक्षण व संस्कृती जपण्याचे काम जेएसपीएम संस्था आजही करीत आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

यावेळी ते एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात महाराष्ट्र विद्यालयातील कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राचार्य मोहन खुरदळे, मु.अ.(प्रा) सुनिता मुचाटे, बालाजी शेळके, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, आपल्याकडील तरूण जगभरामध्ये हुशार आहेत. परंंतु सुशिक्षित बेकार युवकांची संख्याही मोठी आहे. याचे कारण म्हणजे आपल्याकडील शिक्षणपध्दती व बाहेर देशातील शिक्षण पद्धती यामध्ये फरक आहे. बर्‍याचशा देशामध्ये एकाच वेळी अनेक शिक्षणक्रम पूर्ण करता येतात. व त्या शिक्षणाला प्रात्याक्षिकाची जोड आहे. त्यामुळे तेथील तरूण युवकांना तात्काळ नोकरी मिळते. परंतु आपल्या येथील विद्यार्थी मात्र, हुशार असूनही प्रात्याक्षिकाची जोड नसल्यामुळे मागे राहतात. हे वास्तव आहे. शिक्षणाबरोबर मुलांना संस्कारही मिळणे महत्त्वाचे आहे. एखादा मुलगा डॉक्टर, इंजिनियर नाही झाला तरी चालेल परंतु त्याने मानवतेच्या दृष्टिने वाटचाल करावी, असे मतही त्यांनी यावेळी बोलाताना व्यक्‍त केले. प्रारंभी जेएसपीएम लातूर द्वारा संचलित महाराष्ट्र विद्यालय मजगे नगर येथील एन.एम.एम.एस.परीक्षेतील मयुरी चुनचुने, वैष्णवी इर्ले, समर्थ बिराजदार, व्यंकटेश काळे, अंजली पेठकर, पवन भातणासे, कृष्णा येदाले, सोमेश्‍वर पाटील, ओमकार अडागळे, कोमल खंदारे, राम बोयणे, तृप्‍ती बोयणे आदी 12 विद्यार्थ्यांना जेएसपीएम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते कोव्हिड -19 च्या नियमांचे पालन करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालिब शेख यांनी मानले. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यशाचे श्रेय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणारे स्वामी विवेकांनद विद्यालय, स्वामी दयानंद विद्यालय व महाराष्ट्र विद्यालय येथील गुणवंत मुख्याध्यापकांची टीम आम्हाला लाभलेली आहे. त्यांनी स्वतःहुन विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या आष्टी येथील विद्यालयास भेट देवून तेथील गुणवत्ता आत्मसात करून आपल्या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये यशस्वी केले. हीच परंपरा कायम ठेवत जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना अशा विविध परीक्षेसाठी प्रोत्साहीत करावे, अशी आमची अपेक्षा आहे. असे मतही जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!