खरीप हंगामाचा पिक विमा न देता केली शासनाने फसवणूक – भाजपा कि.मो.सरचिटणीस दिलीपराव देशमुख

खरीप हंगामाचा पिक विमा न देता केली शासनाने फसवणूक - भाजपा कि.मो.सरचिटणीस दिलीपराव देशमुख

अहमदपूर (गोविंद काळे) : खरीप हंगाम 2020 चा पिक विमा न दिल्यामुळे आघाडी सरकारने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी अहमदपूर येथील पत्रकार परिषदेत केली. अहमदपूर जिल्हा लातूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख म्हणाले की खरीप हंगाम 2020 मधील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक संरक्षणार्थ भरलेला पिक विमा आज पर्यंत या महाराष्ट्रातील आघाडी सरकारने मिळवून दिला नाही. या गोष्टीचा भारतीय जनता पार्टी निषेध करते आहे. गत खरीप हंगाम हा निसर्गाच्या प्रजन्यमान जास्त होऊन सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. बळी राजा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी जाय बंद होत असताना आघाडी सरकार मात्र शेतकऱ्या कडे दुर्लक्ष करत आहे. नुकसानी संदर्भात गत हंगामात शासनाने अनुदान वाटप केले व शेतकऱ्यांनी पीक संरक्षणात भरलेला पिक विमा हा शेतकऱ्यांना लागू केला नाही 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन कळविले पाहिजे अशी जाचक आठ शासनाने व पिक विमा कंपनीने काढलेली आहे. पाच पाच दिवस पावसामुळे खेड्यापाड्यातील लाईट बंद होती, इंटरनेटचा खेळखंडोबा होता अनेक कामांमध्ये इंटरनेट चालत नव्हतं सर्व वेबसाइट हँग झाल्या होत्या व शेतकऱ्यांत तेवढी जागृती आज आहे काय झाले.मी आज भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधू इच्छितो की गेल्या हंगामातील सोयाबीन पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
आम्ही तसेच अतिवृष्टीमुळे सहा हजार आठशे अनुदान हे दिले पण पिक विमा दिला नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे शासन मान्य करत पण महाविकास आघाडी सरकार मान्य करायला तयार नाही तर अहमदपूर चाकूर तालुक्यात एकूण 60 हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. अहमदपूर चाकूर तालुक्यातील एकूण 60000 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता तरी शासनाने आजतागायत शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिलेला नाही. विधिमंडळात हा विषय मांडला महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस, चंद्रकांत दादा पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश आप्पा कराड, अभिमन्यु पवार या सर्वांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळवून देणार वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार. आम्ही स्वस्थ बसणार नाही. असेही दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.
माझी आपल्या अहमदपूर चाकूर या विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की आपण आपल्या कडील विमा भरलेली पावती झेरॉक्स प्रत व कृषी सहाय्यक काकडे एका अर्जाचा नमुना आपल्याकडे पाठवीत आहे आपण आपापल्या गावातून हे सर्व अर्ज जमा करून आपापल्या संबंधित कृषी सहाय्यक आकडे जमा करून घ्यावी व ते सर्व जमा झाल्यानंतर आपण शासन दरबारी ज्याप्रमाणे आपण कृषी सहाय्यक का मार्फत अनुदान बिलात त्यांच्या पंचनाम्या नुसार शासनाकडे पिक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत भाजपाचे तालुकाध्यक्ष हनुमंत देवकते, सरचिटणीस दत्ता जमालपुरे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोरे, जब्बार पठाण,जयदीप पाटील, आनंदराव पाटील, द्वारकादास नाईक, विजय चिंते आदींची उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!