अण्णा भाऊंच्या साहित्याची प्रेरणा तरुणांनी घ्यावी – आ. बाबासाहेब पाटील

अण्णा भाऊंच्या साहित्याची प्रेरणा तरुणांनी घ्यावी - आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : अण्णा भाऊंच्या साहित्यात उपेक्षित, कामगार, शेतकरी, शेतमजुर यांचे जीवन रेखाटले आहे. तरुणांनी त्यांच्या साहित्याची प्रेरणा घेवून शिक्षण घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आ. बाबासाहेब पाटील यांनी केले ते येथील सार्वजनिक जयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती अ‍ॅड. टी. एन. कांबळे हे होते तर यावेळी मंचावर भाजपा प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. आर. एस. वाघमारे, दलित मित्र उत्‍तम माने, शिवानंद तात्या हेंगणे, पो. निरिक्षक लाकाळ, सहा. पो. निरिक्षक ठाकुर मॅडम, नगर सेविका डावरे, अण्णाराव सुर्यवंशी, माजी प्राचार्य तुकाराम हारगिले, माधवराव जाधव, प्रा.मारोती बुद्रुक पाटील, दत्‍ता वरवटे, ग्यानोबा घोसे, बालाजी जंगापल्‍ले, रामनाथ पलमटे, विनोद नामपल्‍ले, मुजिब भाई आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की, अण्णा भाऊंचे सबंध साहित्य अंर्तमुख करणारे आहे. गुलाम व्हायचे नसेल तर महापुरुषांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. आज समाजाला महापुरुषांच्या विचारांची खुप आवश्यकता आहे. समाजातील तरुणांनी महापुरुषांच्या विचारधारेची जोपासणा करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. सत्‍तेची फळे सर्वांना मिळाली पाहिजे. महापुरुषांच्या कार्यामुळेच आज सन्मानाचे जीवन मिळाले आहे असेही ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. टी. एन. कांबळे म्हणाले की. महात्मा जोतिबा फुले. शाहु महाराज, लहुजी साळवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे य यांचे विचार जोपासणे आवश्यक आहे. अण्णा भाऊंच्या साहित्याचा समाजाच्या उत्थानासाठी उपयोग करुन घेतला पाहिजे. अण्णा भाऊंचे कार्य समाजातील पददलित, वंचित, उपेक्षितांसाठी प्रेमरणादायी आहे. असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, अ‍ॅड. आर. एस. वाघमारे यांचे यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दलित मित्र उत्‍तम माने यांनी केले. ध्वजारोहन आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल डावरे, कार्याध्यक्ष मुकुंद वाघमारे, उपाध्यक्ष दयानंद घेरे, माधव समुखराव, सचिव सुभाष गुंडिले, सहसचिव बालाजी शिंदे, कोषाध्यक्ष नरसिंग सांगवीकर आशिष तोगरे, नितिन डावरे, माधव समुखराव, शाम डावरे, किशन डावरे, नरसिंग वाघमारे, बाळु वाघमारे, दशरथ कांबळे, पप्पु समुखराव, आकाश डावरे, पिंटु समुखराव, किरण वाघमारे , नवनाथ डावरे यासह जयंती महोत्सव समितीचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी लसाकम तालुका अध्यक्ष, रमेश भालेरावएकनाथ पलमठे(उपाध्यक्ष)गणेश वाघमारे(कोषअध्यक्ष), गंगाधर साखरे, शशिकांत गायकवाड( माजी जिल्हाउपाध्यक्ष), अंतराम पिटाळे(माजी अध्यक्ष, प्रा.दिलीप भालेराव, प्रदीप पिटाळे, प्रा.संभाजी दुर्गे, सुग्रीव बेले, दत्तात्रय वाघमारे ( सचिव), मनोहर कवडेकर, भगवान वाघमारे, वाघमारे बी.पी., दशरथ शिंदे, प्रा.बालाजी कारामुंगीकर, श्रावण वाघमारे, नरसिंग कांबळे, ज्ञानोबा गायकवाड, मनोहर सूर्यवंशी, सीताराम शिंदे, जोहारे पिराजी, शरद कांबळे,राजकुमार गोंटे, अंकुश पोतवळे, विश्‍वभर जिवारे, शिवाजी कांबळे, शिवाजी सुर्यवंशी उपस्थिती होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!