लातूरच्या खेळाडूंचे राज्यात वर्चस्व, राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिघांची निवड

0
लातूरच्या खेळाडूंचे राज्यात वर्चस्व, राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिघांची निवड

​ अहमदपूर ( गोविंद काळे ) छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २०व्या कॅडेट (१७ वर्षांखालील) राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील खेळाडूंनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत लातूरने ९ सुवर्ण आणि ६ कांस्य अशी एकूण १५ पदके जिंकून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या कामगिरीमुळे जान्हवी जाधव, साईप्रसाद जंगवाड, आणि रोहिणी पाटील या तीन खेळाडूंची उत्तराखंड येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
​प्रमुख खेळाडूंची कामगिरी:
​जान्हवी जाधव: हिने ‘इप्पी’ या खेळ प्रकारात सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण दोन सुवर्णपदक जिंकले.
​साईप्रसाद जंगवाड: याने सांघिक ‘इप्पी’ मध्ये सुवर्णपदक आणि वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक मिळवले.
​रोहिणी पाटील: हिनेही सांघिक ‘इप्पी’ मध्ये सुवर्णपदक आणि वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक पटकावले.
​संघिक कामगिरी:
​मुलींचा इप्पी संघ: जान्हवी जाधव, रोहिणी पाटील, स्नेहा कश्यप आणि मयुरी वाघमारे या चौघींच्या संघाने सुवर्णपदक जिंकले.
​मुलांचा इप्पी संघ: साईप्रसाद जंगवाड, वेदांत माने, साकिब शेख आणि उवेस शेख यांच्या संघानेही सुवर्णपदक मिळवले.
​मुलांचा सेबर संघ: शुभम करंडे, करण राठोड, तोफिक शेख आणि शोएब शेख यांनी कांस्यपदक पटकावले.
​या सर्व खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले, वजीरोदीन काजी, मोसिन शेख, रोहित गलाले आणि आकाश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर, शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते गणपतराव माने आणि लातूर तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत मोरे, प्रशांत माने, वैभव कज्जेवाड, मेहफूजखान पठाण या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
​उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हे खेळाडू लातूरचे नाव आणखी उज्वल करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!