एल.एस.एस पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांना शेतकरी संघटनेचा पाठींबा – रुपेश शंके

एल.एस.एस पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांना शेतकरी संघटनेचा पाठींबा - रुपेश शंके

क्रांती दिनापर्यंत तोडगा नाही काढल्यास मृत जनावरे कार्यालयात टाकणार

औसा (प्रतिनिधी) : एल.एस.एस पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षकांना महा वेट ने उपचारासाठी अपात्र घोषीत करुन विना परवानगी जनावरांवर उपचार केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची घोषणा केल्यामुळे राज्यभरातील पशुधन पर्यवेक्षक १ ऑगस्ट पासुन बेमुदत संपावर बसले आहेत. त्यांना भेट देऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा देत शेतकरी संघटना पशुधन पर्यवेक्षकांच्या सोबत असल्याची भूमिका शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी मांडली.

राज्यातील सर्व पशुधन पर्यवेक्षक संपावर असल्याने शेतकऱ्यांचे पशुधन संकटात सापडले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराईचा संसर्ग जास्त होत आहे.मात्र त्यांना उपचार करणारे पशुधन पर्यवेक्षक संपावर असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांचा उपचाराअभावी त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यू होत आहे. यांची गंभीर दखल घेऊन शासनाने या एल.एस.एस पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षकांना उपचार करण्याची परवानगी द्यावी अन्यथा संपाच्या काळात मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आजारी व मृत जनावरे संबंधित कार्यालयात टाकू असा इशारा रुपेश शंके यांनी दिला.

एल.एस.एस ही पदवीका शासनमान्य असुन, शासनाच्या अनुदानीत विद्यालयातूनच शिकविलेली आहे.मग अचानक ही पदवीका पुर्ण करुन अनेक वर्षांपासून पशुधनाचा उपचार करणारे पशुधन पर्यवेक्षक अपात्र कसे?असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी लवकरच राज्य नेतृत्वाशी चर्चा करून पशुधनाच्या उपचाराचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकरी संघटना राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे रुपेश शंके यांनी सांगितले. यावेळी स.प.वि.अ.श्री.अंगद मेटे, व्यंकट बिराजदार, एकनाथ भोये, रणजित कांबळे, शिवाजी गायकवाड, स्वामी जगताप व्ही डी, प प धुमाळ बी यस,प प जाधव के ए च, प प कठारे ए.एस , प प कळवले यस एन,शेख ए एम, सेवादाता पांडुळे ए एस,सेवादाता, उबाळे एन एस , कोडे एस एन, मेणगुळे एम डी, कांबळे आर आर, माळी बी व्ही,पटेल एम एम, अंबुलगे आर टी, माने युवराज, घोडके आकाश, ओंकार व्ही.जगताप आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!