नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने उभारली गुढी, काँग्रेस पाहते मागेपुढे! इतर जन जमवतात जोडी जोडी!!

नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने उभारली गुढी, काँग्रेस पाहते मागेपुढे! इतर जन जमवतात जोडी जोडी!!

उदगीर (एल.पी.उगीले) : नगरपालिका निवडणूक जवळ येऊ लागल्या, कोरोना विषाणूचा संसर्गच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पाच सहा महिने पुढे जाण्याची शक्यता असली तरीही, या निवडणुकीत कोणत्याही पद्धतीने आपल्याला सत्ता हस्तगत केलीच पाहिजे. अशा निर्धाराने राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. उदगीर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर जरी निवडून आले असले तरीही विद्यमान स्थितीमध्ये ते महाआघाडीचे महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने सुरू केलेली ही तयारी त्यांना माहित आहे की नाही? हे कळायला मार्ग नाही. काँग्रेस पक्षाचे नेते मात्र घाई न करता महाआघाडी जरी नाही झाली तर किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील. अशा विश्वासावर असल्यामुळे अजून तरी काँग्रेसने स्वतंत्रपणे हालचाल केल्याचे दिसून येत नाही. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली असून रुसवे-फुगवे दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र टोकाला गेलेली गटबाजी आणि प्रचंड मनभेद हे त्यांना एकत्र येऊ देतील की नाही? हा संशोधनाचा विषय आहे. नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सातारकर यांच्या पुढाकारातून शहरातील प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि संभाव्य इच्छुक उमेदवार अशा 100 हून अधिक जणांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली आहेत. तसेच शहरातील नागरी समस्यांच्या संदर्भात माहिती घेतली आहे. अनेक प्रभागात कुठे रस्ते नाहीत, कुठे नाल्या बरोबर नाहीत, कुठे पाण्याची समस्या तर कुठे विजेचा प्रश्न! अशा अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आपले मनोगत या बैठकीत मांडली.

नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने उभारली गुढी, काँग्रेस पाहते मागेपुढे! इतर जन जमवतात जोडी जोडी!!

कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांच्यासह शंकर मुक्कावर, अजीम दायमी, मुसा पठाण, माधव उदगीरकर, अजय शेटकार, दिपाली औटे, सुस्मिता माने, डाॅ. भाग्यश्री घाळे, ज्योती स्वामी, शहनाज शेख, राहुल सोनवणे, सय्यद मोईन, साजिद कुरेशी, फिरोज देशमुख, राजकुमार गंडारे, विजय भालेराव, आतिख शेख, शफी हाश्मी, इम्तियाज शेख इत्यादी मान्यवर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहणार असला तरीही आपण आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. नागरिकांच्या विकासाचे प्रश्न सोडवल्यानंतर नागरिक निश्चितपणे आपल्या  विचाराला महत्त्व देतील, असा विश्वास या प्रसंगी गजानन सातारकर यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी शहरातील विविध लाभार्थ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. गोरगरिबांचे प्रश्न सोडवावेत. असेही आवाहन याप्रसंगी करण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या वतीने अद्याप कोणतीही हालचाल जरी दिसत नसली तरी काँग्रेसचे वन मॅन आर्मी राजेश्वर निटूरे हे कोणत्याही क्षणी आपले वर्चस्व सिद्ध करू शकतात. असेही बोलले जात आहे. एकंदरीत काय तर हळूहळू राजकीय वातावरण तापू लागले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही!

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!