लातूर शहरातील वाहतुक नियोजनाचे अनुशंगाने मंगल कार्यालय मालकांची बैठक

0
लातूर शहरातील वाहतुक नियोजनाचे अनुशंगाने मंगल कार्यालय मालकांची बैठक

लातूर (एल पी उगिले)
गेल्या अनेक दिवसापासून शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याच्या संदर्भात पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर शहरातील मंगल कार्यालय चालकांची आणि मालकांची बैठक घेण्यात आली. अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील वाहनांच्या वाढलेल्या संख्येमळे पार्किंगची समस्या उद्‌भवून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच शहरातील मंगलकार्यालयात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाकरीता येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लातूर शहर येथे दि.१५/११/२०२५ रोजी १७.०० ते १८.०० वा.चे दरम्यान लातूर शहरातील मंगल कार्यालयाचे मालकांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस शहरातील ५० ते ६० मंगलकार्यालयाचे मालक उपस्थित होते.
बैठकीमध्ये मंगलकार्यालयात कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करणेसाठी जवळील मोकळी जागा भाडेतत्वावर घेघेवून,त्यामध्ये पार्कीग करणे व त्यावर संरक्षणासाठी वॉचमन नेमणे बाबत पोलीसांनी सुचना केली असता, त्यास मंगलकार्यालयाचे मालकांनी सहमती दर्शवली आहे. तसेच मंगलकार्यालयात कार्यक्रमाचे बळी डी.जे. डॉल्वी लावता येणार नाही, कार्यक्रमामधील स्पीकरचा आवाज सकाळी ०६.०० ते २२.०० पर्यंत शांतता क्षेत्राकरीता ५० डी.बी ., निवासी क्षेत्राकरीता ५५ डी.बी ., व्यापारी क्षेत्राकरीता ६५ डी.बी, औद्योगीक क्षेत्राकरीता ७५ डी.बी . पर्यंत मर्यादित ठेवावा, कार्यक्रमाची वेळी रात्री १०.०० वा. पावेतो असेल या अटीशर्ती मंगल कार्यालय मालकांनी कार्यक्रमाचे आयोजकांना लेखी कळविणेवावत सांगण्यात आले आहे.
सदरची बैठक समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागातील पोस्टेचे प्रभारी अधिकारी व गोपनिय पोलीस अंमलदार यांनी आयोजीत केली होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!