युवा पिढी समोर जाज्वल इतिहास ठेवण्यासाठी वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती व्यापक स्वरूपात व्हावी – स्वप्निल अण्णा जाधव

0
युवा पिढी समोर जाज्वल इतिहास ठेवण्यासाठी वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती व्यापक स्वरूपात व्हावी - स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर (प्रतिनिधी)
आद्य क्रांतिकारक तथा “जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी” अशा पद्धतीचा क्रांतिकारी विचार ज्यांनी अंगीकारला आणि उपेक्षितांच्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रणसंग्राम लढवला, अशा वस्ताद लहुजी साळवे यांचा क्रांतिकारी इतिहास नव्या पिढीच्या समोर कायम प्रेरणा देणारा ठरणार आहे. तो इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा, यासाठी वस्ताद लहुजी साळवे यांचा जयंती महोत्सव समारोह मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणे गरजेचे आहे. असे विचार वस्ताद लहुजी साळवे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष युवानेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी मातंग समाजातील धडाडीचे नेते बन्सीलालजी कांबळे, पप्पू गायकवाड, बालाजी गडकर, संग्राम अंधारे, दत्ता गडकरी, रंजीत कांबळे, अजित कांबळे, अरविंद शिंदे, हनुमंत जाधव, करण अंधारे, रामेश्वर शिंदे, प्रीतम जाधव, नेताजी कांबळे, अरुण शिंदे, सुलोचनाताई जाधव, रेणुका उपाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना स्वप्निल अण्णा जाधव म्हणाले की, समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघ राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या गटातटाचे राजकारण न करता समाजकारण करण्यासाठी समाजातील जेष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करणे आणि नव्या पिढीला आशीर्वाद देणे गरजेचे आहे. जेणेकरून तरुण एकत्र येतील, आणि जो आदर्श आहे, तो जपण्याचा प्रयत्न करतील. अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
सकाळी ध्वजारोहणानंतर मोठ्या उत्साह शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूकही काढण्यात आली. स्वप्निल अण्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी समाजातील मान्यवर नेत्यांनी या मिरवणुकीचेही स्वागत केले. या मिरवणुकीमध्ये समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!