उदगीरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एकता रॅली उत्साहात संपन्न
उदगीर (प्रतिनिधी): युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त उदगीरमध्ये भव्य एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, मातृभूमी महाविद्यालय, छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय, श्री. हावगीस्वामी महाविद्यालय, बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, लालबहादूर शास्त्री विद्यालय, विद्यावर्धिनी विद्यालय, श्यामलाल व श्यामार्य कन्या विद्यालय, साने गुरुजी विद्यालय या शैक्षणिक संस्थांसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, एनएसएस कार्यक्रमाधिकारी व एनसीसीचे कमांडर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रॅलीचे उद्घाटन उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार राम बोरगावकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, एनएसएस संचालक डॉ. मारोती गायकवाड, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उषा कुलकर्णी-उस्तुरे, जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी होकरणे, माय भारत समन्वयक डॉ. केशव अलगुले व युवा अधिकारी शशांक राऊला उपस्थित होते. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांना डॉ. सिद्धेश्वर लांडगे व डॉ. दत्ताहरी होनराव यांनी सरदार पटेल यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी शुभांगी फड हिने भारत मातेची वेशभूषा करून रॅलीचे आकर्षण वाढविले. मान्यवरांच्या उपस्थितीत नशामुक्त भारत, आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय एकात्मता व मतदान जनजागृती यासंदर्भातील शपथ देण्यात आली. रॅली जिल्हा परिषद मैदान ते लालबहादूर शास्त्री विद्यालय या मार्गे यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बिभीषण मद्देवाड, डॉ. धनराज बंडे, डॉ. गणेश बेळंबे, डॉ. आतिष आकडे, डॉ. विश्वनाथ भालेराव, डॉ. नीलकंठ वगशेट्टे, डॉ. कातकेडे, प्रशांत साबणे यांसह अनेक एनएसएस कार्यक्रमाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
