लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी मतदान करावे-मा. अरविंद रायबोले

0
लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी मतदान करावे-मा. अरविंद रायबोले

……………………………………
महात्मा गांधी महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले मत.
…………………………………..
अहमदपूर ( गोविंद काळे ) मतदान हे भारतीय राज्यघटनेने सर्वांना बहाल केलेला मौलिक अधिकार आहे. सर्व नागरिकांनी अत्यंत सजग राहून आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद रायभोले यांनी केले.
येथील विकास मंडळ संचलित, महात्मा गांधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती व शिस्तपालन विषयक कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अहमदपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी मा. अरविंद रायभोले यांनी मतदान जागृती आणि शिस्तपालन विषयक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना वर्तमान काळामध्ये लोक फसवणूकीचे अनेक फंडे वापरत असून सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरी युवकांनी यापासून सावध राहणे आवश्यक आहे. त्याबरोबरच महाविद्यालयात वावरताना व आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वांनी शिस्तीचे पालन करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी अहमदपूरच्या नायब तहसीलदार शुभांगी जवादे यांनीही विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदानाचे अत्यंत महत्त्व असून विद्यार्थ्यांनी याविषयी आपल्या कुटुंबात व समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबर एक आदर्श नागरिक घडण्यासाठी व भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील अग्नीवीर मध्ये भरती झालेल्या शिवभक्त राजेंद्र, कच्छवे सिद्धेश्वर, ढवळे संविधान, मुंढे शुभम, घुगे चंद्रकांत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर संस्थेचे प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. आर. एम. कदम, प्रा. हेमंत पाटील, उपप्राचार्य डॉ. जे. पी. कलकर्णी, सिनेट सदस्य डॉ विनोद माने, पर्यवेक्षक प्रा. एस. के. गायकवाड, प्रा. ए. एन. शिंदे, एन. सी. सी. प्रमुख डॉ. ए. एम. शिंदे, ग्रंथालय प्रमुख डॉ. एस. आर. सुळसुळे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. डी. गुळवे यांनी केले आभार डॉ. विनोद माने यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!