सीमा भागात औराद कृषी विभागातर्फे शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न ‌

0
सीमा भागात औराद कृषी विभागातर्फे शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न ‌

उदगीर (एल पी उगिले)
सीमा भागातील बिदर जिल्ह्यामधील औराद तालुका येथील कृषी विभाग व (आत्मा) या विभागातर्फे गंगनबीड येथे एक दिवशीय शेतकरी मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. गंगनबीड येथे बळीराजा निवासस्थान लहू लक्ष्मणराव वाडीकर यांच्या शेतीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार पाटील तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ बसवराज बिरादार ( हवामान तंज्ञ संशोधन बिदर) प्रमुख अतिथी कृषी सहाय्यकनिर्देशक.डी.ए.टी.सी. राजकुमार इकेली ,दापका कृषी अधिकारी शिवानंद ,. दापका फलोत्पादन अधिकारी काशिनाथ राठोड, व आत्मा योजनेचे तालुका अधिकारी पांडुरंग पाटील, नवनाथ तपशिळे‌ कृषी सहायक तांत्रिक व्यवस्थापक प्रमुख अतिथी उपस्थित होते. प्रस्ताविक भाषणात पांडुरंग पाटील म्हणाले की, शेतकरी आपल्या शेतात उत्पन्न वाढवण्यासाठी माती, पाणी परीक्षण करून घ्यावे.जमीनीचा कोणता घटक मातीत आहे हे तपासावे. यामुळे जमीनीची सुपीकता टिकून राहते. कमीत कमी खर्चात उत्पादन जास्त मिळवता येते असे म्हणाले. राजकूमार इकेली शेती विषयक बोलताना संयुक्त शेती करण्यातचे आवाहन केले.पशू धन, फलोत्पादन,सरकारी, कृषी पिके, एक पिके न घेता वेगवेगळे प्रयोगीक पिक उत्पादन घेतले पाहिजे.पशुधनातून शेतकऱ्याला मोठा हातभार लागतो. निसर्गाच्या लहरीपणावर आळा घालण्याचं काम शेती करते. डॉ बसवराज बिरादार आपल्या मार्गदर्शनात फळबाग लागवड व उत्पादन फळ यांचे महत्त्व, शुद्ध हवामान तंज्ञ संशोधन, वातावरणात घटक ऑक्सीजन, काॅर्बन, नायट्रोजन इत्यादीचे महत्व पटवून दिले. हवामान समतोल राखण्यासाठी देशातून व परदेशातून फळ बागधारकाना निधी दिला जातो. हवामान समतोल, एकदा लावलेला झाडं उत्पादन दिर्घ काळ देते. हे सांगून विविध उदाहरणे देऊन हवामानाचे महत्व पटवून दिले. काशिनाथ राठोड यांनी आपणास चार एकर जमीन असेल तर एक एकर तरकारी करावे, पाणी नसेल तर शेततळे , ठिबक सिंचन आमच्या विभागातून करून घ्यावे.अशी सविस्तर माहिती दिली. अंकुश वाडीकर बोलताना म्हणली की, फळबाग, तरकारी यामध्ये सातत्य व निष्ठेने काम ठेवल्यास शेतकरी कधीही मागे येणार नाही. शेतकऱ्यांनी व्यावसायीक दृष्टीकोनातून ‌अंगी बाळगून शेती केली पाहिजे. असे सांगुन दापका परीसरातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे बिंदास झाले त्यांचा आभार मानले. त्यावेळी शेतकरी वर्ग राजकूमार शेळके, शुभम पाटील, जगदिश पाटील, नागनाथ स्वामी, रोहीदास पाटील,बाबुराव बिरादार, अंकुश पाटील, तूकाराम बिरादार, राजकुमार बिरादार, लक्ष्मणराव वाडीकर,किशन पाटील, अविनाश पाटील, धनराज वाडीकर, महेश वाडीकर,अशोक वाडीकर. राजकूमार वाडीकर, गोविंद वाडीकर, दिगंबर वाडीकर,राम म्हैत्रै, बालाजी म्हैत्रै, रघुनाथ राठोड, लक्ष्मण म्हैत्रै , किसान वाडीकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले. मोठ्या उत्साहात शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!