विवेकानंद वसंतराव वाडीकर यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत, लातूर जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती

0
विवेकानंद वसंतराव वाडीकर यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत, लातूर जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती

लातूर (प्रतिनिधी)
ग्राहकांचे अधिकार, त्यांच्या न्यायनिवाड्याच्या समस्या आणि वाढत्या महागाईमुळे नागरिकांवर आलेले आर्थिक संकट या सर्व पार्श्वभूमीवर ग्राहक संरक्षण चळवळीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा संवेदनशील काळात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, लातूर जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीसाठी विवेकानंद वसंतराव वाडीकर यांची जिल्हा सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गुरुनाथ मिरकले (पाटील) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन जाहीर करण्यात आली. संस्था स्थापनेपासून ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत असून नव्या पिढीत सजग नागरिक घडविण्याचे काम सातत्याने करत आहे.
ग्राहकांचे हक्क धोक्यात येत असल्याने संघटनात्मक लढ्याची गरज निर्माण झाली आहे.
वाढती महागाई, बाजारातील मनमानी दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, शिक्षण क्षेत्रातील देणगीप्रथा, शासकीय योजनांतील भ्रष्टाचार व गळती यामुळे सामान्य नागरिकांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नागरिकांच्या पैशाचा, त्यांच्या हक्कांचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने ग्राहक पंचायतची भूमिका अत्यंत महत्वाची बनली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांचे हक्क जपणे,
गैरव्यवहारांविरोधात लढा उभारणे,
जनतेत लोकशिक्षण, लोकजागृती व संघटनशक्ती निर्माण करणे,शासन व प्रशासनाला जबाबदार ठेवणे.
या ध्येयधोरणानुसार कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज तातडीची गरज आहे. विवेकानंद वाडीकर यांच्या कामाची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत ग्राहक जनजागृती, तक्रार निवेदन, ग्रामस्तरावरील अभियान, युवकांत जागृती निर्माण केलेली आहे. या कामाची दखल संस्थेने घेतली आहे. त्यांच्या कार्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि सक्रिय संघटनात्मक भूमिकेच्या आधारे त्यांना ही महत्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष मिरकले यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,
“आज जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते अत्यंत गरजेचे आहेत. वाडीकर यांच्या रूपाने जिल्ह्याला एक ऊर्जावान आणि जबाबदार कार्यकर्ता लाभत आहे. निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. लोकांच्या हक्कासाठी लढा देणारे वृत्तपत्र ते चालवत आहेत. त्यांच्या माध्यमातून पंचायतचे काम आणखी प्रभावी होईल.”
नियुक्तीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विवेकानंद वाडीकर यांनी संस्थेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्राहकांची फसवणूक रोखणे, अधिकाधिक नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन करणे, महावितरण, बँका, शिक्षण संस्था, बाजार समित्या व शासकीय कार्यालयातील त्रुटी उघड करणे या क्षेत्रात कामाला नवा वेग देण्याचा माझा संकल्प असेल असे विचार व्यक्त केले आहेत.
निलंगा, औसा, लातूर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीचे स्वागत होत असून वाडीकर यांचे अभिनंदन करण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्राहक आंदोलनाला नवी दिशा देणारी नियुक्ती
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही देशभरात ग्राहक हक्कांचे सर्वात मोठे व्यासपीठ म्हणून ओळखली जाते. जिल्हा सहसचिवपद ही संघटनात्मक दृष्टीने महत्वाची जबाबदारी आहे. वाडीकर यांच्या नियुक्तीमुळे लातूर जिल्ह्यात ग्राहक संरक्षण आंदोलनाला नवी दिशा आणि बळकटी मिळेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!