नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत चंदन बसवराज पाटील नागराळकर विजयी

0
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत चंदन बसवराज पाटील नागराळकर विजयी

उदगीर (एल पी उगिले) उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 यामध्ये प्रभाग क्रमांक 16 ब मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंदन बसवराज पाटील नागराळकर हे नगर सेवक म्हणून अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत 271 मतांनी विजयी झाले आहेत.

नगर सेवक पदी विजयी झाल्यानंतर पत्रकारांना बोलताना चंदन पाटील नागराळकर म्हणाले, उदगीर नगरपरिषद निवडणुकीत माझ्यावर दाखवलेल्या अपार प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाबद्दल प्रभाग क्रमांक 16 ब मधील सर्वच मतदार बंधु-भगिनींचे मनःपूर्वक आभार. आपल्या एकजुटीने, ठाम विश्वासाने आणि पाठिंब्याने मला मोठे यश मिळाले. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतील सहकारी या सर्वांचे मी आभार मानतो.
आजचा हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्या विचारांवर आणि कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आहे. निवडणुकीच्या काळात आपण सर्वांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा यामुळेच आज हे यश मिळाले आहे.
नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या शहराचा कायापालट करणे आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी, मी आजपासूनच कामाला सुरुवात करत आहे. आपल्या प्रभागाचा विकास हे माझे प्रथम ध्येय असणार आहे. नागरी सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल असा विश्वासही याप्रसंगी त्यांनी बोलून दाखवला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!