राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये उदगीरच्या तीन सख्ख्या बहिणी चमकल्या

0
राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये उदगीरच्या तीन सख्ख्या बहिणी चमकल्या

उदगीर (एल पी उगिले) शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मलकापूर या गावच्या तीन सख्ख्या बहिणींनी राष्ट्रीय स्पर्धेचे मैदान गाजवले.
14 वर्षे वयोगटांमध्ये भारती पवार महाराष्ट्र संघाकडून सांघिक प्रकारात खेळत कास्य पदक प्राप्त केले .
17 वर्ष वयोगटांमध्ये जानवी पवार हिने महाराष्ट्र संघाकडून खेळत सांखिक प्रकारामध्ये रोप्य पदक प्राप्त केली आहे .
19 वर्ष वयोगटांमध्ये वैष्णवी पवार हिने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 648 गुण प्राप्त करून प्रथम स्थान पटकावले. सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक
आणि सांघिक स्पर्धेमध्येही सुवर्णपदक प्राप्त करून महाराष्ट्र राज्यसह आपल्या जिल्ह्याचे, आपल्या तालुक्याचे, आपल्या गावाचं नाव सुवर्णाक्षरात कोरले आहेत .या तीन पवार भगिनींनी आपली पावर दाखवून दिली आहे .
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानवी पवार इयत्ता दहावीत शिकत आहे. आणि वैष्णवी पवार इयत्ता बारावीत शिकत आहे.या बहिणींनी आपल्या शिक्षणासोबत खेळाला समतोल ठेवले आहे. खेळ आणि शिक्षण हे कशाप्रकारे घ्यावे, हे या तिघांच्या कृती मधून दिसून येते.

या तिघे बहिणी गुरुकुल स्पोर्ट क्लब मध्ये सुधीर पाटील, सुषमा पवार, मारोती बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहेत

हे यश पाहून जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे ,आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक रणजीत चामले, लातूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे ,सचिव अशोक जंगमे,राजकुमार देवकर ,हनुमंत केसरे, नवनाथ गरगटे ,क्रीडाप्रेमी भास्कर पाटील ,खलील खान पठाण,यमुनाजी भुजबळे ,जिलानी शेख ,शंकर जाधव ,रामेश्वर मोतीपोळी ,बालाजी केंद्रे .
यांनी या तिघांना कौतुक केले व शुभेच्छा दिल्या

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!