काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष पदासाठी लागली चुरस

काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष पदासाठी लागली चुरस

नाशिक ( आकाश शेटे ) : काँग्रेसचा शहराध्यक्ष लवकरच बदलला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच नाशिकमध्ये जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याची धमक असलेल्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.

काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष शरद आहेर यांची फेब्रुवारीत प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली. त्याआधी तब्बल सात वर्षे आहेर शहराध्यक्षपदाचा कारभार पाहत असले तरी आता नवीन नेतृत्वाला संधी दिली जावी, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडूनही जोर धरू लागली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाशिकमध्ये आलेल्या पटोले यांनी शहराध्यक्षांसह अन्य काही पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. आगामी महापालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार, असे पटोले यांनी यापूर्वीच जाहीर केले असून नाशिक दौऱ्यातही त्याचा पुनरुच्चार करण्यात आला. परंतु, अद्याप शहरात काँग्रेसला लोकांचे फारसे पाठबळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. महापालिकेचा गड स्वबळावर काबीज करण्यासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत ठेवावी लागणार आहे. सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांना टक्कर द्यायची असेल तर तेवढेच तोलामोलाचे उमेदवार देण्याचे आव्हानही काँग्रेस पक्षासमोर आहे. त्यामुळे अनुभवी आणि खमक्या नेतृत्वाचा शोध पक्षाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या ही नावे चर्चेत आहेत !

शहराध्यक्षपदी संधी मिळावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सरचिटणीस भरत टाकेकर, नगरसेवक राहुल दिवे, राज्य प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे याशिवाय यापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले राजाराम पानगव्हाणे यांचे नावही शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. शहराचा अभ्यास असणाऱ्या आणि जातिपातीचे संतुलन साधण्यासह ज्येष्ठांना बरोबर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच शहराध्यक्ष म्हणून नियुक्त करावे लागणार आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!