चाकूरच्या नगरपंचायत प्रशासनाचे शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सत्कार

चाकूरच्या नगरपंचायत प्रशासनाचे शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सत्कार

विविध आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावल्याबद्दल करण्यात आला सत्कार

चाकूर (सुनिल जाधव) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे चाकुर तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील विविध समस्या बद्दल निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते याच निवेदनाची आंदोलनाची दखल घेत चाकुर नगरपंचायत प्रशासनाने वेळेतच प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आज नगरपंचायत प्रशासनाचे शहर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. नगरपंचायत वर सध्या प्रशासक नियुक्त असल्यामुळे चाकूर-अहमदपूरचे उपजिल्हाधिकारी नगरपंचायत प्रशासक म्हणून प्रमोदय मुळे आणि मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे या दोन्ही अधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने चाकूर शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन व आंदोलन करून शहरातील समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा या खूप काही मागणीसाठी शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगितले गेले होते तरी हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला,यावेळी शहरातील घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे या डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंगू चिकनगुनिया अशा साथीच्या रोगाने लहान मुलांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढले आहेत त्यामुळे शहरात धूर फवारणी करण्यात आली, शहरात काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे ज्या ठिकाणी चिखल झाले आहे त्या ठिकाणी मुरूम टाकून घेतले आहेत आणि शहरात विजेचा लपंडाव हे सारखे चालू होते तरी विद्युत महावितरण कार्यालयाला निवेदन देऊन वेळेमध्ये रोहत्री दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. चाकूर शहरातील उजळंब रोडलगतच्या नाल्या हे तुडूंब भरून रस्ते शेजारील घरामध्ये घाण पाणी जात होते त्या ठिकाणच्या नाल्या साफसफाई करून तेथील नाली स्वच्छ करण्यात आले. या सर्व मागण्यांचे निवेदन देऊन वेळेत नगरपंचायत प्रशासनाने काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चाकूर शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पप्पूभाई शेख, भागवत फुले,गंगाधर केराळे, सिताराम मोठेराव,सलीम भाई तांबोळी,बाळू इरवाने, विजय धनेश्वर,नितीन पाटील,बाबूराव शेटे,प्रकाश पटणे,अनिल महालिंगे,गफूर मासूलदार,सुनील शिंदे, आनंद झांबरे,सचिन चाकूरकर,शंकर मोरे,बबलू झांबरे,कैलास मोठेराव इत्यादी शहर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!