अक्का महादेवी यांनी ईश्वर उपासना आणि समाजसेवा करून धार्मिक गौरव वाढवला. प्रा.सौ, निलांबिका हुनगुंद (बडीहवेली)

अक्का महादेवी यांनी ईश्वर उपासना आणि समाजसेवा करून धार्मिक गौरव वाढवला. प्रा.सौ, निलांबिका हुनगुंद (बडीहवेली)

उदगीर (प्रतिनिधी) : अक्का महादेवी यांनी ब्रह्मचर्य व्रत स्विकारून ईश्वर उपासना व समाज सेवा करून धार्मिक गौरव वाढविला असे विचार प्रा.सौ. निलांबिका(हुंनगुंद)बडीहवेली यांनी व्यक्त केले.
वीरशैव समाज उदगीर च्या वतीने संग्राम स्मारक येथील अॅड धर्मवीर संग्रामप्पा शेटकार सभागृहामध्ये आयोजित 87वा वचन सप्ताहाचे तिसरे पुष्प प्रा.सौ. नीलंबिका (हुनगुंद)बडीहवेली यांनी वीर वैराग्य निधी अक्का महादेवी आणि वचन साहित्य या विषयावर आपले विचार व्यक्त केले. एक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम मोतीपवळे होते तर समाजाचे प्रतिनिधी म्हणून कोषाध्यक्ष सुभाष धनुरे ते उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर अॅड संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विचार व्यक्त करताना प्रा. सौ निलांबिका बडेहवेली यांनी अक्का महादेवी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले. अक्का महादेवी या संयम आणि सदाचाराचा तेजस्विनी होत्या संसार आणि धर्मसेवा दोन्ही एकत्र राहून होत नाही म्हणून इच्छेचे बलिदान देऊन त्यांनी वैराग्य वृत्ती स्वीकारली ईश्वर हेच पती रूपात पाहिले तृष्णा आणी वासनेच्या घेऱ्यात अडकलेल्यांना याचे महत्त्व कळणार नाही . षडविकारावर विजय मिळवून त्यांनी वैराग्य वृत्ती स्वीकारली ईश्वरालाच पतीच्या रूपात पाहिले अक्का महादेवी याच्यात ज्ञानाचा भांडार होता त्यांनी 430 वचन लिहिले असून भारतीय इतिहासातील नारी शक्ती होती पुरुषी वर्चस्वाला झुगारून त्यांनी वैराग्य वृत्ती स्वीकारली अक्का महादेवी आपल्या वचनातून स्त्रियांच्या पुरुषी प्रवृत्ती विरुद्धचा संघर्ष आणि त्याचा त्रास व्यक्त केला अक्का महादेवी या भगवान शिवाच्या निष्ठावान भक्त होत्या मन, शरीर व आत्मा भगवान शिवाला समर्पित केले होते . वैराग्य वृत्ती स्वाकारलेल्यांनी उंच डोंगरावर जंगलात घर केल्यानंतर जंगली श्वापदांना भेऊन कसे चालेल ,समुद्राकाठी घर करून भरती पाण्याला भेऊन कसे चालेल, भरल्या बाजारांमध्ये घर करून शांतीची अपेक्षा कसे करता येईल तसेच इहलोका मध्ये जन्म घेतल्यानंतर समाजात निंदा स्तुतीची परवा करून कसे चालेल म्हणून कोणी काहीही म्हटले तरी मन समाधानी ठेवणे गरजेचे आहे असे अक्कामहादेवी यांनी आपल्या वचनातून बहुमोल असे विचारांची देण दिली आहे असे विचार प्रा. सौ. निलांबिका बडुहवेली यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात राम मोतीपवळे यांनी वीरशैव समाज उदगीर च्या वतीने गेली 87 वर्षापासून पचन सप्ताहाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजात रुजवण्याचे कार्य करत आहे. वचन सप्ताहाच्या माध्यमातून नामवंत अशा भक्तांचे व्याख्याने आयोजित करून बौद्धिक मेजवानी देण्याचे काम हे अभिनंदन असून या पुढील काळात अधिक चांगले वक्ते वचन सप्ताच्या माध्यमातून देऊन महात्मा बसवेश्वर यांचे विचार सर्वदूर पोहोचण्याचे काम करावे असे विचार व्यक्त केले.अक्का महादेवी, महात्मा बसवेश्वर त्याचबरोबर शरण शरणांची वचने शाळा महाविद्यालयातून स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन करून प्रत्येक घरात वचनांचे पारायण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली महात्म्यांचे विचार हे जाती धर्माच्या चौकटीत न ठेवता सर्व मानवजाती साठी आहेत असे विचार व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय उत्तराताई कलबुर्गे यांनी केला.कार्यक्रमाचे संचलन व आभार गुरुप्रसाद पांढरे यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!