आ. बाबासाहेब पाटील यांनी दिले अहमदपूर तालुक्यातील आरोग्यविषयक मागण्यांसाठी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांना निवेदन

आ. बाबासाहेब पाटील यांनी दिले अहमदपूर तालुक्यातील आरोग्यविषयक मागण्यांसाठी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांना निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेशजी टोपे यांना आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन मिळणेसाठी विविध मागण्यांचे निवेदन दिले.यामध्ये अहमदपूर तालुक्यातील विविध विषयांवर प्रकाश टाकून त्यांची प्रामुख्याने दखल घेण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी श्री.राजेशजी टोपे यांच्याकडे करण्यात आली. यात पुढीलप्रमाणे मुद्दे मांडण्यात आले.

१. ग्रामीण रुग्णालय अहमदपूर जि.लातूर या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात यावे जेणे करुन खाटांची संख्या वाढेल व अधिक संख्येने वैद्यकीय अधिकारी,प्यारामेडीकल कर्मचारी उपलब्ध होऊन जनतेला सर्व प्रकारचे आवश्यक उपचार मिळतील.
२. अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्रामाकेअर युनिटसाठी कर्मचारी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करावी.
३.अहमदपूर ग्रामीण रुग्णालयासाठी कार्डियाक अॅम्बुलन्स उपलब्ध करुन देण्यात यावी.
४.बायोमेडीकल वेट्स लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एकच कार्यालय आहे. सदर कार्यालयातून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याने वैद्यकीय सेवेतील खाजगी व शासकीय रुग्णालय यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कार्यालयाचे विकेंद्रीकरण व्हावे आणि तालुका स्तरावर बायोमेडीकल वेट्स जमा करणारी संस्था उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी.
५. अहमदपूर येथे तालुका स्तरावर सुसज्ज मेडिकल लॅब व ग्रामीण भागात मोबाईल मेडिकल लॅब उपलब्ध करुन देण्यात यावी.
६. शासकीय व खाजगी डॉक्टरसाठी डॉक्टर भवन बांधकाम करण्याबाबत मागणी आहे. त्यासाठी आवश्यक शासकीय जागा व बांधकामासाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.

वरील सर्व विषयावर आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली. या विषयावर योग्य आणि सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ याची ग्वाही यावेळी राजेशजी टोपे यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांना दिली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!