आ. बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते घनकचरा संकलन, वर्गीकरण प्रक्रिया व पूर्नवापर प्रकल्पाचा शुभारंभ

आ. बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते घनकचरा संकलन, वर्गीकरण प्रक्रिया व पूर्नवापर प्रकल्पाचा शुभारंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे नगर परिषद, अहमदपूरच्या माध्यमातून आणि 15 व्या वित्त आयोग अंतर्गत शहरातील घनकचरा संकलन, वर्गीकरण प्रक्रिया व पूर्नवापर करणे आणि अनुषंगीक कामाचा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.या प्रकल्पामुळे शहरातील प्रदूषण तर कमी होईलच पण त्याचबरोबर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून आपलं अहमदपूर ओळखलं जाईल. या माध्यमातून शहरातील ओला, सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने गोळा केला जाणार आहे. त्यानंतर या कचऱ्याचे वर्गीकरण प्रक्रिया करून पूर्नवापर करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचा खत उपलब्ध होईल. शहरातील कचऱ्याचे प्रदूषण कमी होईल. आज या प्रकल्पाचा शुभारंभ केला लवकरात लवकर यंत्रणा कामाला लावण्याच्या सूचना देखील दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष सौ.अश्विनी कासनाळे, काँग्रेस आय जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, जि.प. सदस्य माधवराव जाधव, नगरसेवक अमित रेड्डी, अभय मिरकले, सय्यद सरवरलाल, अझहर बागवान, पांडुरंग मिरकले, वसंतराव शेटकर, लक्ष्मीकांत कासनाळे, रवी महाजन, संदीप चौधरी, आशिष तोगरे, बाबूभाई रुईकर, अफरोज पठाण, फेरोज शेख, हुसेन मणियार, दस्तगीर शेख, दयानंद पाटील, श्याम देवकत्ते, कमलाकर नळेगावकर, अजिज काझी, मुसा शेख, चंद्रशेखर भालेराव, सुनिल सोनकांबळे, संदीप वाघंबर, अशोक सोनकांबळे, संदीप शिंदे, सय्यद नबी, अशोक कल्याने, धम्मपाल ढवळे, राणीताई गायकवाड, यांच्यासह सर्व कामगार उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!