गणेशोत्सव सजावटीसाठी वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध – १० ते १५ टक्के दरवाढ

गणेशोत्सव सजावटीसाठी वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध - १० ते १५ टक्के दरवाढ

नाशिक (रोहीत टोम्पे) : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला असून सजावटीचे साहित्य मोठय़ा प्रमाणावर बाजारात दाखल झाले आहे. गणेशोत्सवावर यंदाही करोनाचे सावट  असले तर घरगुती का होईना गणपती उत्सव वेगळ्या प्रकारे साजरा करण्यासाठी लगबग वाढली आहे. रंगीत फु लांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई यांसह वैशिष्टय़पूर्ण साहित्य  बाजारात दाखल झाले आहे. सजावटीच्या साहित्यात मागील वर्षांच्या तुलनेत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. करोनामुळे सार्वजनिक मंडळांच्या अर्थकारणावर परिणाम झाला असला तरी वर्गणीसाठी करण्यात येणाऱ्या दादागिरीचा त्रासही त्यामुळे कमी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानही आहे. दुसरीकडे, शहराच्या मुख्य बाजारपेठेत झालेल्या खोदकामामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बाजारात ऑर्किड, झेंडू, शेवंती, गुलाब, मोगरा यांसह अन्य फु लांच्या प्लास्टिक माळा आल्या आहेत. याशिवाय मोती, कु ंदन काम असलेली रंगबेरंगी तोरणे, पूजेची आकर्षक थाळी, डोक्यावरील फु लांची छत्री तसेच थर्माकोलवर बंदी असल्याने फोममधील लाकडी मखर भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. कमळ, करंडा, मंदिर अशा वेगवेगळ्या आकारात मखर उपलब्ध आहेत. मोजक्या साहित्याचा वापर करत घरच्या घरी मखर तयार करण्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

मागील आठवडा शांततेत गेला, परंतु तीन-चार दिवसांत गर्दी वाढत आहे. यंदा फु लांच्या लडी, पानांचे वेल, वेलवेट हार, सुटे फु ले, जरीचे पडदे याशिवाय काही फॅ न्सी प्रकार आले आहेत. ग्राहकांना परवडतील अशा ३० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत एका वस्तूसाठी द्यावे लागत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत १० ते १५ टक्के  वाढ असली तरी प्लास्टिक झेंडू, हरित गालिचा यांना चांगली मागणी असल्याचे ज्योती नॉव्हेल्टीचे नरेश करिया यांनी सांगितले.

दुसरीकडे, गौरी-गणपतीची सजावट करणाऱ्यांची करोनाच्या सावटामुळे मोठी कामे हातातून गेली आहेत. सार्वजनिक मंडळ असो की उद्योग, व्यावसायिक त्यांच्याकडे यंदा फारशी कामे नाहीत. उत्सवातील डामडौलपणा हरवला आहे. लोक साधेपणाने उत्सव साजरे करत आहेत. याआधी दोन ते तीन महिने देखावे, सजावटीचे काम चालत असे. मात्र यंदा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला तरी कामाविषयी विचारणा नाही. किरकोळ कामे सुरू असल्याची खंत मयूर मोरे यांनी व्यक्त केली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!