जीवनाला दिशा देणाऱ्या शिवरत्न पुरस्काराचे मोल्य व पावित्र्य जपले पाहिजे – ना.संजय बनसोडे राज्यमंत्री

जीवनाला दिशा देणाऱ्या शिवरत्न पुरस्काराचे मोल्य व पावित्र्य जपले पाहिजे - ना.संजय बनसोडे राज्यमंत्री

लातूर (प्रतिनिधी) : प्रत्येक वेक्तीच्या जीवनात कार्य पाहुन मान सन्मान व पुरस्कार मिळत असतो परंतु शिवदर्शन फाऊंडेशन लातूर व लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमीत दिला जाणारा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा पुरस्कार आहे याचे एक वेगळेच महत्त्व व दर्जा प्राप्त आहे . पावित्र्य व मोल्य आपण सर्वांनी जपले पाहिजे मानाचा शिवरत्न पुरस्कार स्वीकारणार्य सर्व वेक्तीच्या जीवनात यामुळे योग्य दिशा व ऊर्जा मिळणार आहे असे मत राज्याचे राज्यमंत्री मा ना संजय बनसोडे पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी म्हणाले

कार्यक्रमाला अध्यक्ष हभप प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर उदघाटन माजी आ अॅड त्रंबक नाना भिसे महापौर विक्रांत गोजमगुडे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील लातूर मिशन वृत्तपत्राचे संपादक तथा शिवदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत जाधव हे मंचावर उपस्थित होते यावेळी बोलताना विलासराव देशमुख यांनी प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याची भुमिका घेतली त्यांचे कार्य सर्वाना प्रेरणा देणारे आहे. अशा अष्टपैलू वेक्तीचा स्मृतिदिनानिमित्त शिवरत्न पुरस्कार दिला जातो हा आगळा वेगळा सोहळा आहे याचे नियोजन खुप चांगले केल्या मुळे सर्व संयोजकाचे अभिनंदन केले विविध विषयांवर राज्यमंत्री संजय बनसोडे यावेळी बोलले

समाजातल्या चौदा रत्नांचा शिवरत्न देऊन गौरव केल्याने त्यांची उंची वाढली
हभप प्रशात महाराज चव्हाण खानापुरकर

पुरस्कार दिल्याने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते सकारात्मक कार्याला आणखीन चांगले स्वरूप येते या पुरस्काराचे पवित्र आपण जपले पाहिजे कारण विलासराव देशमुख साहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा हा पुरस्कार आहे यावेळी चौदा रत्नाचा गौरव केल्याने त्यांची उंची नक्कीच वाढली आहे असे प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर म्हणाले

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करणे ही खूप मोठी बाब आहे
माजी आ अॅड त्रंबक नाना भिसे

पुरस्कारामुळे वेक्तीचे खुप महत्व वाढते त्यांच्या कार्याला वेगळा आयाम प्राप्त होतो पुरस्काराला महत्व असते ते शेवटपर्यंत अबाधित ठेवले पाहिजे असे मत माजी आ अॅड त्र्यंबक नाना भिसे यांनी व्यक्त केले

काळाची पावले ओळखून वृत्तपत्र क्षेत्रात बदल आवश्यक
युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी लातूर

वृत्तपत्र क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर काळानुसार बदल घडत आहेत पत्रकारांनी पत्रकारीता क्षेत्रात बदल केला पाहिजे सध्याची पत्रकारिता ही खूप वेगळी आहे या स्पर्धेत टिकायचे असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करणे गरजेचे आहे असे अभ्यास पुर्ण मत मांडुन लातूर मिशन वृत्तपत्र व शिवदर्शन फाऊंडेशन चे कौतुक युवराज पाटील यांनी केले

पत्रकारांनी रोखठोक व निर्भीड लेखणीची वापर करावा
जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे
सध्याच्या काळात परखड व निर्भीड भुमिका मांडणारे वृत्तपत्र व पत्रकाराची भुमिका महत्वाची आहे एखादा विषयाला पत्रकारच न्याय देऊ शकतो त्यामुळे त्या लेखनीला धार असणे गरजेचे आहे सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन जयप्रकाश दगडे यांनी केले

प्रशासनात व समाजात उत्कृष्ट कार्य करणार्यां वेक्तींचा गुणगौरव सोहळा
भारत जाधव अध्यक्ष शिवदर्शन फाऊंडेशन लातूर
दरवर्षी शिवरत्न पुरस्कार देऊन कर्तबगार व्यक्तींचा मान्यवरांच्या हास्ते गौरव केला जातो ही सन्मानाची परंपरा यापुढे अशीच चालू राहील माझ्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व प्रमख मान्यवर व पुरस्कार प्राप्त वेक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे मत पत्रकार तथा शिवदर्शन फाऊंडेशन चे अध्यक्ष भारत जाधव यांनी मांडले

पुरस्कार प्राप्त सुर्यकांत सुडे (सरपंच हरंगुळ बु.), डॉ. लक्ष्मण देशमुख (जिल्हा शल्य चिकित्सक, लातूर), शाम गोडभरले (गटविकास अधिकारी पं.स., लातूर), अनिल कांबळे (जिल्हा जलसंधारण अधिकारी, लातूर), डॉ. जयपक्राश दरगड (प्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर), महादेव आसलकर (तंत्र अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर), निळकंठ पवार (प्रशासकीय समन्वयक, जेएसपीएम संस्था, लातूर), उत्तम गोमसाळे (ग्रामसेवक, लातूर), शिवाजी हेडगे (मुख्याध्यापक, श्री केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर), दत्तात्रय शिंदे (तलाठी सज्जा, लातूर),संगम कोटलवार (संपादक, दै. सारथी समाचार), सर्फराज मणियार (अध्यक्ष, सहारा ग्रुप, लातूर), अमित तिकटे (डिजीटल मिडया, लातूर), तेजस धुमाळ (संगित कला क्षेत्र) या मान्यवरांना मानाचा शिवरत्न पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.
यावेळी सुत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी केले तर आभार प्रा विनोद चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमाला मान्यवर व पुरस्कारार्थी सह परमेश्वर घुटे, सुरेश काचबावार, तानाजी घुटे, कैलास साळुंके, श्रीराम गायकवाड, अजित दुटाळ, दयानंद माने, शंकर जाधव, अजित काळदाते, बालाजी वाघमारे, गोविंद जगताप, कुमार भालेराव, दिपक बोराडे, तुकाराम जोगदंड, अनिल शेळके, संतोष मगर, लखन सावंत, श्रॄषी मोरे, अजित माने, दिपक शिंदे, विष्णू शिंदे, महेश राठोड व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!